You are currently viewing मुंबईला निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात!

मुंबईला निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात!

25 प्रवासी जखमी तर काहींची प्रकृती गंभीर

शिवाजी गोरे, रत्नागिरी

शिमगोत्सव साजरा करून पुन्हा परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात (ST Bus Accident) झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) दापोली केळशी येथे उटंबर – मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत.

समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे वाहन चालकाचे म्हणणे आहे . परंतु या वाहन चालकाने मद्यपान केलं असल्याचं बोललं जात आहे. सदर वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप लोकांनी केला आहे.

तसंच अपघात झाल्याने ही बस केळशी येथे उभी करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जखमी प्रवासी व अन्य प्रवासी यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + sixteen =