You are currently viewing आदर्श शिक्षक निर्माण झाल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळी ओळख – दीपक केसरकर

आदर्श शिक्षक निर्माण झाल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळी ओळख – दीपक केसरकर

गुरुसेवा सन्मान पुरस्कार समारंभात शिक्षकांचा गौरव

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षक निर्माण झाल्याने आज जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे. त्यामुळेच शिक्षणाचे कार्य पवित्र असून त्याला कधीही शिक्षकी पेशा म्हणता येणार नाही, असे उद्गार माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी काढले. दरम्यान दीपकभाई मित्र मंडळ यांच्या वतीने गेली ८ वर्षे दिले जाणारे गुरुसेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते बोलत होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष तारी सर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, व्हीक्टर डान्टस, अशोक दळवी आदी शिक्षक उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच शिक्षणाच्या बाबतीत पुढे राहिला आहे. येथील शिक्षकांचे कार्य शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही मूल्यवान असे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. अशात शाळा-महाविद्यालये ही सुरू झाली आहेत. त्यामुळे शिक्षकांनी शैक्षणिक कार्याबरोबरच मुलांची विद्यार्थ्यांची काळजीही तितकीच घेणे आवश्यक आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून मोठे झालेले व शिक्षकांची काळजी घेणारे म्हणून उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांचे नाव अग्रक्रमाने येता येईल.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, आज समाजात शिक्षकांना वेगळे स्थान आहे. सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगातही कोकण नेहमी पुढे राहिले आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जी मुले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात तीच मुले स्पर्धा परीक्षांमध्ये टिकतात. त्यामुळे आज ज्याप्रमाणे या मंडळाकडून शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.तसाच गौरव जे शिक्षक आपल्या मुलांना मोठ्या शाळेत न शिकवता जिल्हा परिषदेचे सारख्या शाळेत शिक्षण देत आहेत. अशा शिक्षकांचाही गौरव करण्यात यावा.
मंडळाकडून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील २५ शिक्षकांना हे पुरस्कार देऊन पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रमाणपत्र, व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारप्राप्त शिक्षकामध्ये सीमा पंडित, मनीषा खरात, कावेरी गावडे, दत्तकुमार फोंडेकर, रामा गावडे, अर्चना सावंत,नितीन सावंत,शंकर वाघमोडे,दादा डोंबरे,सुधीर गावडे,प्रफुल्लता धुरी,उदय गवस,श्रद्धा चोडणकर,प्रदीप शिंदे,लक्ष्मण परब,विश्वनाथ राऊळ,गुरुनाथ ताम्हणकर आदी जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष तारी सर तर सूत्रसंचालन विठ्ठल गावडे यांनी केले. यावेळी प्रकाश गोवेकर विठ्ठल कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + three =