You are currently viewing नागरिकांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार-आमदार वैभव नाईक

नागरिकांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार-आमदार वैभव नाईक

कुडाळ:

नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आज दुपारी 1 वाजता तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहिले. सामान्य ग्रामस्थांना अनेक अडचणी ऑनलाइन कामकाजमुळे उद्भवतात. त्यामुळे पुढील काम करायला दीर्घ कालावधी लागतो. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन वैभव नाईक यांनी तहसीलदार अमोल फाटक यांच्या समवेत नागरिकांना दिले. उत्पन्नाच्या दाखल्यालाही विलंब होत असल्याने त्यावर कॅम्प राबवून त्याचा लाभ नागरिकांना घेता येईल असे यावेळी आमदार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्व नागरिकांच्या समस्या त्यांनी प्रांताधिकारी यांच्या समोर मांडल्या. लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी नागरिकांना दिले. आपले प्रशासन पारदर्शी चालते. त्यामुळे प्रत्येकाने विश्वास ठेवावा असेही त्या वेळी आमदारांनी सांगितले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,जयभारत पालव, अतुल बंगे, रुपेश पावसकर,संतोष शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =