You are currently viewing अखेर डाव्या कालव्यातील पाणी प्रवाह सुरू

अखेर डाव्या कालव्यातील पाणी प्रवाह सुरू

दोडामार्ग

तिलारी धरण प्रकल्पाचा खानयाळे येथील डाव्या कालव्याला पडलेल्या भगदाड घटनेच्या बाराव्या दिवशी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळी डाव्या कालव्यातील पाणी प्रवाह सुरू करण्याची चाचणी घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.यावेळी कार्यकारी अभियंता बाळकृष्ण आजगेकर, सरपंच लखू खरवत, गोपाळ गवस आदी शेतकरी उपस्थित होते.
कालव्यातील पाणीपुरवठा सुरळीत केल्याने शेतकरी बागायतदार यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.कालव्यातील पाणी प्रवाहाचा वेग वाढविल्यानंतर आज सायंकाळपर्यंत गोवा हद्दीत पाणी पोहचणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 12 =