You are currently viewing वारसा साहित्य मंचामार्फत पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

वारसा साहित्य मंचामार्फत पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर :

वारसा साहित्यमंचाद्वारे पहिले राज्यस्तरीय कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 25 मे (रविवार) रोजी जिजाऊ मंदिर बाबा पेट्रोल पंपाजवळ, म्हाडा कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.

पहिले कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मा. प्रिया धारूरकर असतील. या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर येथील ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री भारत सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध गझलकार, कवी, संपादक मा. श्री.रज्जाकभाई शेख असतील. या कार्यक्रमासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध गझलकार, निवेदक मा. श्री.बाळासाहेब गिरी , तसेच पुणे येथील काव्यवाणी काव्यसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा. वाणी ताकवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कवी श्री अर्जुन गायकवाड संपादित ‘ वारसा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रह तसेच कवी श्री ज्ञानदेव डिघुळे लिखित ‘ आप्पा शब्दांचे दर्पण ‘ या कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या दोन्ही काव्यसंग्रहाचे निर्मिती काव्यगंध प्रकाशनाने केलेली आहे. याप्रसंगी सर्वंच कवींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लातूर येथील कवी प्रा.डॉ.सुशिल सातपुते करणार आहेत. वारसा साहित्य मंचामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात तसेच विविध साहित्यिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जास्तीत जास्त कवीने नोंदणी करावी व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन वारसा साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष कवी मा.अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष कवी मा.पवन शेळके, सचिव कवी मा.ज्ञानदेव डिघुळे, कवी प्रा. डॉ. सुशिल सातपुते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कवी श्री अर्जुन गायकवाड (7499788620) यांना संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा