*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
________________________
श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना – काव्यपुष्प – १८ वे
___________________________
श्री सद्गुरू तुम्ही । दत्तारूपात दिसता तुम्ही । नामस्मरण करितो आम्ही । सदा,तुमचे स्वामी ।। १ ।।
रोज घ्यावे सद्गुरूंचे नाम । मनाला आवडेल हे काम ।
श्रीदत्तनाम । तारक आहे हो ।। २ ।।
शब्द-अक्षरातली काव्य-कथा । सुरू आहे स्वामींची
भ्रमाणगाथा । वाचून,ठेवा चरणी माथा । स्वामींचा चरणी ।।३ ।।
श्री दिगंबराचार्य करिती । हिमालायात भ्रमंती । दूर करिती । भक्तांच्या शंका ।। ४ ।।
साधकाने भेट घेतली । स्वामींशी चर्चा केली । शंका त्याची पार फिटली । स्वामी उपदेश ऐकता ।। ५ ।।
दिगंबराचार्य श्रीगुरू बोलले । फार विचार करणे तू पाहिजे सोडले । कृतिशून्य मन नसे भले । बघ विचार करून ।। ६ ।।
त्या साधकाला श्रीगुरू सांगती । असू दे स्नेह निसर्गाप्रती ।
राहून याच्या संगती । समज-उमज येईल रे तुजला ।। ७।।
तू अति घाई नको करू । तुझा शोध राहू दे सुरू । नवे विचार लागतील तुज स्फुरू । भेटू आपण योग्य वेळी ।।८।।
**********************************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________