You are currently viewing शहरातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा आसनी रिक्षा स्टॅन्डसाठी जागा उपलब्ध करून देणार

शहरातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सहा आसनी रिक्षा स्टॅन्डसाठी जागा उपलब्ध करून देणार

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सहा आसनी रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासन

कणकवली ​:

कणकवली शहरातील सहा आसनी रिक्षा चालक – मालकांना रिक्षा स्टॅन्डसाठी फ्लाय ओव्हर ब्रिजखाली पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने काही महीने यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. नगरपंचायतमार्फत जागाही निश्चित करण्यात आली असून, सहा आसनी रिक्षा चालकांनी निर्धास्त रहा. तुम्हाला रिक्षा पार्किंग करण्यासाठी जागा देण्याची जबाबदारी आमची असेल अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सहा आसनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाला दिली.
सहा आसनी रिक्षाचालकांनी शनिवारी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, राजू गवाणकर आदी उपस्थित होते. सहा आसनी रिक्षाचालकांनी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा मुद्दा नगराध्यक्ष नलावडे यांच्याकडे मांडला. तसेच सदर रिक्षा स्टॅन्ड वरून नरडवे, नाटळ, दिगवळे, कनेडी आदी भागांमध्ये फेऱ्या होत असून, बस स्थानकासमोरील जागा योग्य असल्याचे मागणी करण्यात आली. मात्र तूर्तास वाहतुकीस अडथळा होऊ नये अशा जागी रिक्षा पार्किंग करा. हायवे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नगरपंचायतमार्फत तुम्हाला योग्य अशी जागा दिली जाईल. असे सांगण्यात आले. कणकवली शहरात सुमारे ​४० सहा आसनी रिक्षा असून तेवढ्या रिक्षा पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली. त्यावर नगराध्यक्ष नलावडे यांनी बस स्थानकाबाहेर फ्लायओव्हर ब्रिज खाली योग्य जागा दिली जाईल. त्याचे नियोजन देखील करण्यात आले आहे. फक्त काम पूर्ण करण्याची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. यावेळी सहा आसनी रिक्षा संघटनेचे राजेश पवार, संजय पवार, विठ्ठल वाळके, राजेंद्र येरम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 20 =