You are currently viewing कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळ्याची लवकरच पुर्नप्रतिष्ठापना…

कणकवलीतील छत्रपतींच्या पुतळ्याची लवकरच पुर्नप्रतिष्ठापना…

२६ रोजी लोकप्रतिनिधींसमवेत बैठक…

कणकवली
शहरातील तेलीआळी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौपदरीकरणात बाधित होत आहे. फेब्रुवारी महिन्यात छत्रपतींची जयंती असून त्यापूर्वी येथील पुतळ्याची पुर्नप्रतिष्ठापणा करण्याबाबत मराठा समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने २६ जानेवारीला आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी व कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रित आणून जागेबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी माहिती मराठा समाजाचे नेते एस.टी.सावंत यांनी आज दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुर्नप्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने मराठा समाज बांधवांची मराठा मंडळ सभागृहात आज बैठक झाली. त्यानंतर याबाबतची माहिती श्री.सावंत यांनी दिली. या बैठकीला त्यांच्यासोबत लवू वारंग, भाई परब, बच्चू प्रभुगावकर, सुशील सावंत, सखाराम सपकाळ, अविनाश राणे, यश सावंत आदी उपस्थित होते.
एस.टी.सावंत म्हणाले, अखंड जगभरात ज्यांचा आदर्श घेतला जातो, ज्यांना राष्ट्रपुरुष मानले जाते अशा छत्रपतींचा पुतळा चौपदरीकरणात धूळखात उड्डाणपुलाखाली असल्याची बाब खेदजनक आहे. याबाबत राजकीय लोकांकडून वेगवेगळ्या जागा सुचवण्यात आल्या आणि एकमेकांनी सुचवलेल्या जागांना विरोधही झाला. त्यामुळे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच राहिला. याप्रश्नी सर्वांनी एकमत करत छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा निश्‍चित करण्याची गरज आहे. कणकवली शहराच्या लौकिकाला शोभेल असा निर्णय आपण सर्वांनी एकत्रित येऊन घेतला पाहिजे. आमदार, खासदार व मंत्री यांनी पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली. मात्र त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आज पुन्हा एकदा मागणी करावी लागली. गेली तीन वर्षे हा प्रश्न प्रलंबित असताना याबाबत ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे या प्रश्नी आता मराठा समाज पुढाकार घेत असून, येत्या २६ जानेवारी रोजी आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी व कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रित आणत यासंदर्भात एकमत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =