You are currently viewing वेंगुर्लेत दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान सुरू…

वेंगुर्लेत दोन्ही ठिकाणी शांततेत मतदान सुरू…

दुपारपर्यंत आरवलीत ४३.७५ तर सागरतीर्थ येथे ४७.४५ टक्के मतदान…

वेंगुर्ला
तालुक्यात आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी १.३० पर्यंत आरवलीत ४३.७५ तर सागरतीर्थ येथे ४७.४५ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० पासून मतदानाला संत गतीने प्रारंभ झाला. मात्र सकाळी १० पासून मतदारांचा सर्वच मतदान केंद्रावर जोर पाहायला मिळाला. दुपार पर्यँय शांततेत मतदान सुरू आहे.
आरवली ग्रामपंचायत निवडणूक ही भाजप शिवसेना यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. या निवडणुकीत दुपारी १.३० पर्यंत एकूण मतदार संख्या १ हजार ७१२ पैकी ७४९ एवढे म्हणजेच ४३.७५ टक्के मतदान झाले. तर
सागरतीर्थ ग्रामपंचायतचा विचार करता याठिकाणी याअगोदरच शिवसेनेची सुप्रिया कुडव ही बिनविरोध निवडून आल्याने सेनेचे पारडे जड आहे. तर इतर उर्वरित ८ जागांसाठी काँगेस व शिवसेनेत मुख्य लढत पाहायला मिळत आहे. सागरतीर्थ येथील ग्रामपंचायतीची एकूण मतदार संख्या १ हजार ६६५ पैकी दुपारी १.३० पर्यंत ७९० म्हणजेच ४७.४५ टक्के एवढे मतदान झाले आ

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 2 =