You are currently viewing स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत स्मार्ट ग्रामपंचायतचा तालुका स्तरीय निकाल जाहीर

स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत स्मार्ट ग्रामपंचायतचा तालुका स्तरीय निकाल जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जाहीर केला निकाल

सिंधूदुर्गनगरी

स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत २०१८-१९ मधील तालूका स्तरीय निकाल जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जाहिर केला आहे. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे ग्राम पंचायतीची तालूका स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात आली असून केवळ सावंतवाडी तालुक्यात दोन ग्राम पंचायतींची निवड करण्यात आली आहे. आता या नऊ ग्राम पंचायत मधून जिल्हास्तर पुरस्कारासाठी मूल्यमापन जिल्हास्तरिय समितीने सुरु केले आहे, अशीही माहिती यावेळी अध्यक्षा सौ नाईक यानी दिली. जिल्ह्यात आठ तालुके असून आठ ग्राम पंचायती स्मार्ट ठरल्या आहेत. यात सावंतवाडी तालुक्यात दोन ग्राम पंचायतींना समान गुण मिळाले आहेत. यात न्हावेली आणि इन्सुली (८४ गुण) ग्राम पंचायतचा समावेश आहे. वेंगुर्ले तालुक्यात मठ (७५ गुण), कुडाळ तालुक्यात कसाल (७८ गुण), दोडामार्ग तालुक्यात कुंब्रल (८६), मालवण तालुक्यात मालोंड (७६ गुण), देवगड तालुक्यात पावणाई (७६ गुण), कणकवली तालुक्यात असलदे (८६ गुण), वैभववाडी तालुक्यात नावळे (७० गुण) अशाप्रकारे ग्राम पंचायती तालूका निहाय विजेत्या ठरल्या असल्याचे अध्यक्षा सौ नाईक यानी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 9 =