You are currently viewing केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन व्यवसायासाठी प्रशासन प्रतिबद्ध

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन व्यवसायासाठी प्रशासन प्रतिबद्ध

श्री मंदार हाडके प्रकल्प समन्वयक पर्यटन मंत्रालय यांचे प्रतिपादन

मालवण :

केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून त्यात महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. सदर योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली आहे. या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल,होम स्टे,ऍग्रो टुरिझम,रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नित्यानंद प्राईड रिसॉर्ट, तोंडवली मालवण येथे पर्यटन व्यावसायिकांची दिनांक 7/2/24 रोजी दुपारी दुपारी 3.00 वाजता या बैठकी आयोजित करण्यात आली होती. या मध्ये श्री मंदार हाडके (प्रकल्प समन्वय) यांचा तोंडवळी येथील पर्यटन व्यावसायिक व माजी सरपंच श्री आबा कांदळगावकर यांच्या हस्ते सत्कार आला. यावेळी बोलताना श्री मंदार हाडके म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी कार्य होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या समन्वय साधून कार्य केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी निधी पोर्टल वर पर्यटन व्यावसायिकांनी कश्या पद्धतीने नोंदणी करावी यांचे मार्गदर्शन केले. न्याहरी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तोंडवळी गावात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री विष्णू मोंडकर स्वदेश दर्शन समिती सदस्य तसेच अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी बोलताना सांगितले की तोंडवळी गावात पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून ह्या भागात आज पर्यटन व्यवसाय बहरतं आहे. जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर कृषी, मेडिकल, हिस्ट्री जंगल टुरिझम क्षेत्रात काम काम होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि प्रशासन या मध्ये समन्वय साधणे, पर्यटन स्थळांवर आवश्यक सुविधा निर्माण करणेसाठी प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी स्थानिक जिल्ह्यातील 40 पेक्षा जास्त व्यावसायिकांनी या मध्ये सहभाग घेतला. यावेळी तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर, श्री रवींद्र खानविलकर, श्री आबा कांदळगाकर, श्री अवि सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री संजय केळूसकर यांनी केले. तसेच यावेळी कार्यक्रमासाठी जागा उपलध करून दिल्याबद्दल श्री मनीष कट्टी यांचे आभार मानण्यात आले. यावेळी माजी सरपंच श्री सागर मालडकर, श्री आशिष पाटील, उपसरपंच श्री हर्षद पाटील, श्री आंनद झाड, उमा टिकम, श्री प्रणीत शेलटकर, श्री गुरु राणे, श्री जिजा टेमकर, श्री ओमकार तोंडवळकर, श्री दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 5 =