You are currently viewing देशभक्तीचा पाया विद्यार्थीदशेतच मजबूत केला पाहिजे – पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला

देशभक्तीचा पाया विद्यार्थीदशेतच मजबूत केला पाहिजे – पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला

कुडाळ :

 

“देशभक्तीचा पाया हा विद्यार्थी दशेतच मजबूत केला पाहिजे. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहून वेळेचा सदुपयोग करण्याची सवयही विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविणे गरजेचे आहे”. असे प्रतिपादन कुडाळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रुनाल मुल्ला यांनी केले त्या मुंबई येथील २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निरपराध नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये “मुंबईवर झालेल्या २६/ ११ चा हल्ला” हा फार भीषण होता संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं ;परंतु या भीषण हल्ल्याला आपल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले. आणि दहशतवाद्याना कंठस्नान घातले. या भीषण हल्ल्यात अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आले. त्यादिवशी या सर्व अधिकारी व पोलिसांनी आपल्या प्राणाची बाजी लावून मुंबईचा संरक्षण केलं. कसाबसारख्या दहशतवाद्याला जिवंत पकडले.

देशभक्तीची ही जाणीव लहानपणापासून विद्यार्थी दशेपासूनच येते. यासाठी सर्वांनी विद्यार्थीदशेत मेहनत घेतली पाहिजे. देशभक्ती म्हणजे सीमेवर जाऊन लढणे नाही तर आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात आपण जाणार आहोत त्या क्षेत्रात आपली सुशील उंची गाठणे म्हणजे देशसेवा होय. डॉक्टर, इंजिनीयर, नर्स, वकील शिक्षक, कर्मचारी या माध्यमातून आपण देशाची सेवा करू शकतो. आणि ही सुद्धा देशभक्ती आहे. थोडक्यात आपली प्रत्येक कृती आपलं प्रत्येक कार्य देशाच्या प्रगतीसाठी निष्ठेने अर्पण केलं तर याच्यासारखी देशसेवा नाही असे सांगितले.

त्यांनी संविधान दिन व एनसीसी डे यानिमित्ताने मनोगत व्यक्त करताना “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची जी उद्देशिका तयार केले आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे‌. आपला देश हा विविध जाती धर्म यामध्ये विभागलेला आहे.स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता ही मूल्ये जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातच देशाचा विकास प्रगती लपलेली आहे”.

“आज २६नोव्हें. या संविधान दिनाच्या निमित्ताने ऐक्याची भावनेनची सतत जाणीव ठेवून.त्या संविधानाप्रती आपण आदर व्यक्त केला पाहिजे व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे”.असे सांगत मिशेल फर्नांडिस ने संविधानचे वाचन केले त्यांच्या सोबत संविधानाच्या वाचनात सहभाग घेतला.

याच दिवशी एनसीसी डे होता .एनसीसी डे निमित्ताने मनोगत व्यक्त करताना “एनसीसी एक त्यागाचे प्रतीक आहे .ज्या माध्यमाद्वारे आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ची शिस्त, देशप्रेम,त्यागाची शक्ती संचारते व आपण देश सेवा करण्यासाठी तयार होतो .यात एनसीसीचा जो युनिफॉर्म आहे; तो युनिफॉर्म आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. आणि आपल्या जीवनात शिस्त निर्माण करतो. एनसीसी कॅडेट देशाच्या मदतीसाठी केव्हाही तयार असतो आणि असले पाहिजे. तुम्ही सुद्धा या एनसीसीच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी नेहमी तयार असला पाहिजे‌ असे सांगत.शुभेच्छा दिल्या

यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर, डॉ.व्यंकटेश भंडारी, हेड कॉन्स्टेबल संजय कदम, कुडाळ पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद मर्गज व विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते.

मैदानावरील मानवंदना अर्पण करणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले तर 26 /11 च्या घटनेची क्षणचित्रे, संविधान दिन एनसीसी डे या प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगिता शिरसाट -तिळवे यांनी केले. एनसीसी च महत्व मेता जमदाडे हिने कथन केले. तर उपस्थितांचे आभार विभा वझे यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा