You are currently viewing शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीचा सावंतवाडीतून पाठिंबा….

शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीचा सावंतवाडीतून पाठिंबा….

केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध

सावंतवाडी
गेले बारा दिवस दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन काळ्या कायद्या विरोधात शेतकरी बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी बांधवांनी भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर पाठिंबा दिला असून त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात महाविकास आघाडी सरकारने पाठींबा देण्यासाठी निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + eight =