You are currently viewing (५) पाचवी माळ……

(५) पाचवी माळ……

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री पल्लवी उमेश कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

(५) पाचवी माळ……

*मला भावलेलं स्त्रीत्व*

 

नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏

नवदुर्गा मंत्र

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी

तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,

पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।

 

*पंचम देवी स्कन्दमाता नमस्तुभ्यम.*

 

सिंहासनगता नित्यम् पद्माश्रितकरद्वया।

शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥५॥

अर्थ…….सिंहावर स्वार होऊन दोन हातात कमळाचे फूल धारण करणारी प्रसिद्ध स्कंदमाता आपल्यासाठी शुभ होवो.

स्कंद म्हणजे कार्तिकेय… त्याची आई म्हणून ही स्कंदमाता .

मला वाटते आपण सर्वजण टिव्ही मालिका बघत असणारच. सध्या स्टार प्रवाह वर गेल्या २/३ वर्षा पासून ” आई कुठे काय करते ” ही मालिका चालू आहे.या मालिका बद्दल खूप मतप्रवाह आहेत…कुणाला आवडते कुणाला नाही.पण मी बघते आणि मला आवडते.

 

एक सर्व साधारण घरातील मुलगी, वडील नसल्याने लवकर लग्न होऊन नवीन घरी येते. शिक्षण लग्नामुळे अपुरे राहते, जे पुढे संसारात अधिकाधिक अडकत गेल्याने पूर्ण होऊ शकलेले नसते.अशी तुमच्या आमच्या सारखी एक संसारी स्त्री यात दाखवली आहे…घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत तीन मुलांची व सासू सासऱ्यांची सेवा करत असता, आपल्या आवडी निवडी ती पूर्ण विसरूनच गेलेली असते.

 

हेच चित्र तर आपण आज आपल्या आजूबाजूला बहुतेक प्रत्येक घरात बघत आहोत.किती तरी स्त्रिया आज लग्नानंतर आपले गाव आणि आपले मित्र परिवार बरोबर आपल्या आवडी, आपले छंद, सगळे सगळे मागे ठेवून आलेल्या असतात.

नवीन घर आपलेसे करता त्या स्वत:चे अस्तित्व विसरतात,आणि याची जाणीव क्वचितच एखाद्याला असते. आपले गाव सोडून येणाऱ्या स्त्रिया स्वतःचे अस्तित्व विसरतात…

‘ कोण होतीस तू, काय झालीस तू ‘… असं काहींच्या वाट्याला येतं…गोल्ड मिडेल मिळवलेल्या आणि आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या मुली लग्नानंतर पूर्ण घरातच अडकतात…हा स्वानुभव ! ….

 

अशा कितीतरी स्त्रिया आहेत. तर काहींचा कायापालट ही उत्तम होतो…. लग्ना नंतर गाव चांगले मिळाले, घरदार प्रोत्साहन देणारे भेटले ,तर ती स्त्री आपल्या आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करताना दिसते…म्हणजे नाण्याला दोन्ही बाजू आहेत…पण त्या खऱ्या ही आहेत ..फक्त आपला जसा चष्मा तशी ती बाजू दिसते.

 

प्रत्येक स्त्री ने घराबाहेर पडले पाहिजे.. सतत घरामध्ये स्वतःला कामात बुडवून न घेता ,स्वतःचा विचार करायला हवा…त्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे. अगदी नोकरी व्यवसाय जरी करत नसली ती, तरी काही काळ बाहेर भाजी आणायला, देवाला, मैत्रिणीकडे असे जायला हवे . बाहेरच्या व्यक्तींशी मिसळले पाहिजे ..म्हणजे आत्मविश्वास वाढतो. लोक ओळखतात, बोलतात…त्यामुळे आत्मिक समाधान मिळते. बाहेरचे जग कळते.

 

ती हे सर्व करत असताना मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, पुरुषांच्या मानाने ती एक पाऊल पुढे आहे…कष्ट आणि जबाबदारीच्या दृष्टीने.

स्त्री ही निसर्गतः प्रजननासाठी निर्मिलेली गेली आहे..शिवाय घर ,कुटुंब यात भावनिक दृष्टीने जास्त अडकणारी आहे..घरावर आलेले कोणतेही संकट ती समर्थपणे पेलत पुढे जात राहते. हार मानून कच खात नाही कोणतीही स्त्री. घरची जबाबदारी पर्यायाने कुटुंबातील सर्व सदस्य, मुलांचे संगोपन ही उत्तम रीतीने सांभाळत, तारेवरची कसरत करत या बाहेरच्या जबाबदार्या पार पाडत आहे.

हे सर्व करत असताना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व्यवस्थित असणे अर्थातच आवश्यक आहे.

 

काळ पुढे सरकतो….आजची गोष्ट आता खरचं खूप बदलली आहे, पण आमच्या वेळी बायका बँकेची कामे, बाहेरचा बाजारहाट स्वतः करत नसत…नवरा या बाजू सांभाळत असल्याने…… आम्हां स्त्रियांना बँकेची कामे आता करायला थोड अवघड जाते….एकटीने बाजारहाट करणे अवघड वाटते …नवीन एखादी गोष्ट एकटीने खरेदी करणे म्हणजे पाप वाटते ..मग सोने चांदीच्या वस्तू एकटीने खरेदी करणे लांबच…

पण आता दिवस खूप बदलले आहेत… आज आपल्या लेकी सुना खूप स्मार्ट आहेत…एकटीने धडाधड निर्णय घेत सर्व आघाड्या अगदी समर्थपणे सांभाळत आहेत … आणि हे त्या घरातील वृद्ध लोकांना बरोबर घेऊन हे विशेष…म्हणजे फोन वरील ॲप समजावून सांगणे, लॅपटॉप हाताळायला शिकवणे, गुगल पे वर वस्तू कशा खरेदी करणे, घर बसल्या पैसे पाठवणे….हे सर्व सर्व तर ही नवीन पिढीच शिकवत असते आपल्या आई बाबा/सासू सासऱ्यांना…आणि मी म्हणते मुलांपेक्षा या मुलीच सावकाश छान शिकवतात आपल्याला.आणि आपण शिकतोय हे ही आपलेच कौतुक .

आमच्या वेळी असं नव्हतं, तसं नव्हतं म्हणतं त्यांना सतत उपदेश देण्या ऐवजी, जर आपण त्यांच्या नाविन्यतेचे कौतुक केले,त्यांच्या आवडी जोपासल्या ,तर मागची पिढी पण जीवनाचा नवीन अनुभव घेऊ शकते…मी हे फक्त सध्या स्त्री बद्दलच बोलते आहे, कारण स्त्रियाच फार काड्या करतात दुसऱ्या स्त्रीच्या संसारात असे म्हणतात..पण हे चित्र ही आता कमी होताना दिसत आहे…ही चांगली जमेची बाजू आहे.

माझे स्पष्ट असे मत आहे ,की प्रत्येक स्त्रीने स्वतः ला आपल्या आवडत्या कामात गुंतवून घ्यावे .स्वयंपाक पाणी,आले गेले हे सर्व सोडून, कारण ते तर करायचेच आहे आपल्याला. पण त्या व्यतिरिक्त….मग ती कोणत्याही वयाची का स्त्री असेना ..गाणी म्हणणे, क्लास घेणे, विणकाम,भरतकाम, फ्रिलांनसिंग ….लेखन,कविता ,कथा लिहिणे …चित्र काढणे….समाज उपयोगी काम करणे…ई. असे काही तरी निवडून त्यात रमवावे….म्हणजे बाकीचे नकारात्मक विचार मनात न येता सकारात्मक जीवन जगता येईल. आणि आपले वागणे हे नेहमी सकारात्मक आणि दुसऱ्याला मदत करण्यासारखे असावे. आपल्या सत्य आणि गोड वागण्याने समोरच्याला आपली गरज वाटली पाहिजे असे वागणे असावे आपले. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे प्रत्येक घरच्या कर्त्या स्त्रीने आत्मसात करायला हवे. तिच्यावरचं घराचा संपूर्ण डोलारा उभा असतो. येवढ्या तेवढ्या गोष्टीने ˈपॅनिक् न होता धीराने आल्या प्रसंगाला शांत राहून मार्ग काढायला हवा.

 

घरी दारी लोकांनी आपल्याला मिस करायला हवे….तर ते योग्य जगणे होय… असे अर्थात माझे मत . कर्तुत्ववान स्त्री बद्दल मला काय सर्वांनाच आदर असतो …पण ज्या तशा नसतील , तर त्या आपल्या गोड वागण्याने आणि हसत मुख असतील तर नक्कीच त्या तोडीच्याच असतात. अशा स्त्रिया श्रध्दाळू असतात. देवावर श्रद्धा असणाऱ्या असतात. कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असतात…

 

आता या नव्या पिढीत अजून एक बदल होताना दिसत आहे. तो म्हणजे लव्ह मॅरेज. हे स्विकारायला आता जुनी पिढी तयार ही झालीय.पण जाती बाह्य लग्न ही तितक्याच संख्येने आज होताना दिसत आहेत..आणि आपण ते सकारात्मक राहून स्वीकारत आहोत….ही खूप आनंदाची गोष्ट समाजात पसरत आहे. फक्त येणारी नवीन मुलगी ही वेगळ्या वातावरणातील असल्याने तिला सामावणे थोडे जड जाऊ शकते…तिला थोडा वेळ द्यायला हवा…आणि हे मुख्य काम घरच्या प्रमुख स्त्रीचे आहे…आणि ते तिने व्यवस्थित हाताळायला हवे. घरातच स्त्री स्त्रीची शत्रू असू नये…ह्याची दक्षता घ्यायला हवी…सासू – सून, नणंद – भावजय , जावा – जावा….अशा नात्यात प्रेम असावे, सौहार्दपूर्ण नातं असावे….तर अख्ख कुटुंब निरोगी, निकोप राहण्यास मदत होते. असो..!

हे सर्व घरच्या खंबीर स्त्री वरच अवलंबून असते.

अशा सर्व स्त्रियांबद्दल मला अतिशय आदर आहे . अशी समर्थ स्त्री आज प्रत्येक घरात आहे.आणि यापुढे ही असणार आहे. त्यांच्यातील या समर्थ स्त्रीत्वाला माझा मनापासून सलाम आहे…

 

“या देवी सर्वभूतेषु श्रध्दा-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”

……………………………………………..

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

 

 

*संवाद मिडिया*

 

*स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर – माधवबाग*

 

*Advt Link👇*

————————————————–

*जनरल डायग्नोस्टिक, थायरोकेअर व माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने*

 

*स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर*

 

*दि. 22 ऑक्टोंबर 2023, वार – रविवार वेळ स 7.00 ते स 11.30 पर्यंत*

 

*खाली दिलेल्या आजारांवर रक्त तपासणी केली जाईल*

हृदयरोग ,मधुमेह, पॅरालिसिस, लिव्हरचे विकार, व्हिटामिन्स, हाडांची ठिसूळता ,थायरॉईड ग्रंथीचे विकार,किडनी, ॲनिमिया

 

1) *ॲडव्हान्स पॅकेज ~4600~ फक्त 999/- मध्ये*

 

2) *ॲडव्हान्स हेल्थ पॅकेज + व्हिटामिन्स पॅकेज ~6900~ फक्त 1699/- मध्ये*

 

👉 *सूचना – उपाशीपोटी सॅम्पल द्यावे*

 

👉 *नाव नोंदणीसाठी संपर्क*📝

 

*माधवबाग*

कणकवली – 9373183888

कुडाळ – 9011328581

सावंतवाडी – 7774028185

सागावकर हॉस्पिटल माणगाव – 9421390281

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा