You are currently viewing स्व.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती  –  भाजपा नेते आम. नितेश राणे

स्व.बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी सरकाची आज स्वाभिमानाची वर्ष पूर्ती  –  भाजपा नेते आम. नितेश राणे

कणकवली

स्व.बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारसरणी विकून उद्धव ठाकरे यांनी जी बेइमानी केली. त्याला बाजूला करून ५० योध्ये सोबत घेवून.शिंदे – फडणवीस यांनी राज्यात सत्ता आणली. हिंदुत्ववादी सरकार आणले आणि ठाकरे यांना कायम स्वरुपी घरी बसविले.आज त्या स्वाभिमानाची वर्ष पूर्ती आहे. स्व.बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्व आणि सरकारची वर्ष पूर्ती आहे.असे प्रतिपादन भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केले.ते ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,आदित्य ठाकरे यांचे जवळचे आणि त्यांचे कट्टर असलेला राहुल कणाल हा उद्या सेनेत प्रवेश करणार.हा आदित्य ला फार मोठा राजकीय धक्का आहे

कोव्होड सेंटर भ्रष्ट कारभरात वरून सरदेसाई यांचा मोठा वाटा.सूरज चव्हाण यांच्या जबाबात सरदेसाई यांचा सर्वत्र उल्लेख आला आहे. आता सरदेसाई भाजप किंवा शिंदे सेनेसोबत जाण्यास इचून आहे.ते कुठे कुठे भेटून पक्षात घेण्याची विनंती करत असतात हे लवकरच सांगु.शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाकरेंना कायमचे निवृत्त करण्याचे काम राऊत, सरदेसाई करत आहेत, असेही आमदार राणे म्हणाले.
यातूनच शरद पवार समजायला आम्हाला शंभर जन्म द्यावे लागणार असतील तर ठाकरेंना २०० जन्म घ्यावे लागतील.असा टोला लगावला. शदर पवार यांच्या गुगली मुळे पहाटेच्या शपथविधीत व्हीकेट जशी अजित दादांची पाडली तशी ठाकरेंना कायमचे घरी बसवून त्यांचीही व्हीकेट पाडली आहे.
खा.संजय राऊत हे दिल्लीत हाऊस किपिंग चे करत आहेत काय ? त्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबध्दल काय माहित आहे. त्यांनी पत्रकारिता करावी.जिहादी विचारांचे लोक फारच वळवळ करू लागले आहेत. जास्त फुगे उडवत असती तर जिहादी लोकांना एकदाच टाचणी लावावी लागेल.आणि ती कशी लावायची हे आम्हाला माहीत आहे असा इशारा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा