टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी (india vs england 2021 2nd test day 4) सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी
- Post published:फेब्रुवारी 16, 2021
- Post category:क्रिडा / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी रोज योगा आवश्यक – योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव
लातूर जिल्ह्यातील क्राँक्रीट रोडची कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे – अमित देशमुख
महायुतीच्या योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाल्याने तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील – श्वेता कोरगावकर
