You are currently viewing वेंगुर्लेत पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील ओहोळावर बांध घाला…

वेंगुर्लेत पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील ओहोळावर बांध घाला…

वेंगुर्लेत पाणी टंचाई टाळण्यासाठी शहरातील ओहोळावर बांध घाला…

तालुका काँग्रेसची मागणी; विविध प्रश्नांसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…

वेंगुर्ले

शहराला पाणीटंचाई होऊ नये यासाठी शहरातील मुख्य ओहोळावर बांध घालण्यात यावेत तसेच महाजनवाडी रस्ता तातडीने डांबरीकरण करावा अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांनी आज मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे केली. महाजनवाडी येथील नागरिकांना घेऊन आज त्यांनी मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांची भेट घेतली. यावेळी विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी माजी नगरसेविका कृतिका कुबल, माजी नगरसेवक मनिष परब, सिद्धेश मांजरेकर, पूर्णिमा महाजन, मथुरा मोरजकर, खुशाल निरनडेकर, मोस्तुभ मयेकर, तेजस कुडाळकर, उदय महाजन, भालचंद्र परब, अजय माणगांवकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =