You are currently viewing वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद…..

वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद…..

मंदिरे सुरु करण्यासाठी दिले निवेदन….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी अजूनही परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्यावतीने
वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी, विविध सांप्रदायाचे मान्यवर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाही करण्यात आल्या.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे रवींद्र परब, देवस्थानचे पूजारी विजय गुरव, नितेश परब, स्वप्निल परब, मंगेश परब, विष्णू परब, जगदीश परब, बाळा परब, प्रसाद परब, मानकरी सुनील परब, शिवराम परब, भाजपाचे समीर चिंदरकर, राहूल मोर्डेकर, निलय नाईक, भगवान नाईक, आनंद गावडे, बाळकृष्ण मयेकर, ओंकार चव्हाण, शरद मेस्त्री, विनोद लोणे, शेखर काणेकर, निखिल घोटगे, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

या घंटानाद दरम्यान, ‘दार उघड उद्धवा, दार उघड‘, ‘मदिरा चालू, मंदिर बंद‘, ‘उद्धवा तुझा कारभारच धुंद‘, ‘दारु नको, दार उघड‘, ‘भक्तांना जेल गुन्हेगारांना बेल, उद्धव सरकार झाले फेल‘, अशा स्वरुपाच्या घोषणा देण्यात आल्या.

ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिराबाहेर घंटानाद झाल्यानंतर वेंगुर्ला तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले. तहसीलदार कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधींनीजवळ निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र वगळता देशभरात सर्व मंदिरे दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. परंतु हिंदुत्वद्वेषी आघाडी सरकार जाणिवपूर्वक जनतेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.

या तिघाडी सरकारकडून संधी मिळेल तेव्हा हिंदुत्व विषयाची गळचेपी करण्याचे कारनामे सुरु आहेत. राज्यातील जनतेची श्रद्धास्थाने असलेली सर्व मंदिर कोविड नियमावलीच्या अटी शर्थीसह त्वरित खुली करण्यासाठीची आमची असलेली मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवावी, असे या निवेदनात म्हटले आहे. वेंगुर्ला शहराबरोबरच तुळस, म्हापण, वायंगणी, रेडी येथीलही ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोर ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या त्या मंदिरांचे मानकरी, पूजारी, भाविक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 15 =