You are currently viewing आशिये व कलमठ गावच्या सीमेवरील माळरानावर आगीने घेतला भडका

आशिये व कलमठ गावच्या सीमेवरील माळरानावर आगीने घेतला भडका

कणकवली

तालुक्यातील आशिये व कलमठ गावच्या सीमेवरील माळरानावर आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आग लागली. साधारणपणे दीड ते दोन किलोमीटर चा परिसर भर दुपारी कडाक्याच्या उन्हात आगीने वेढला होता. नगरपंचायतच्या अग्निशमन बंब च्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, आशिये आणि कलमठ च्या सीमेवर संदीप मेस्त्री मित्रमंडळच्या वतीने क्रिकेट च्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. सर्व काही सुरळीत सुरू असताना दुपारी २:०० वा. च्या सुमारास अचानक दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून कडाक्याच्या रणरणत्या उन्हात आग लागली. ही आग कोणी लावली हे मात्र समजू शकले नाही. मात्र आजूबाजूकच्या परिसरात मोठ्या प्रमाणत धुर पसरला होता.

कलमठ चे सरपंच संदीप मेस्त्री आणि भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांनी आजूबाजूच्या परिसरातील बागायतींचा विचार करून तातडीने कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंब ला पाचारण केले व अग्निशमन बंबच्या माध्यमातून पेटलेली आग विजविण्यात आली. त्यामुळे पुढे होणारे मोठे नुकसान टळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा