You are currently viewing कलमठ येथे आर्थिक देवाण-घेवाणीच्या भांडणातून रिक्षा जाळली

कलमठ येथे आर्थिक देवाण-घेवाणीच्या भांडणातून रिक्षा जाळली

रिमेश चव्हाण सह सहकाऱ्यावर गुन्हा दाखल

कणकवली

आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून रिक्षा जाळण्याचा प्रकार कलमठ येथील मठकर कॉम्प्लेक्स येथे काल रात्री घडला. याप्रकरणी कणकवली पोलिसात रिमेश चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरज जाधव (कणकवली – कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते रिमेश चव्हाण यांच्यासह आप्पा शिर्के याच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा जाळण्याच्या या प्रकाराने मात्र तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सुरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज जाधव यांचे पैशाच्या देवान घेवाणीवरून वरून काल बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावेळी रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच रिक्षाच्या मडगळ वर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी सुरज जाधव यांनी कणकवली पोलिसात बुधवारी रात्री चौघां विरोधात तक्रार दाखल केली होती. सुरज जाधव हे घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटच लावतो अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी हे घरी गेले व रात्री झोपत असताना त्यांना घराच्या खिडकीतून बाहेर ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता रिमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे पळताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पाणी मारून रिक्षाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकी ना देखील आगीची झळ बसली. या आगीत रिक्षेचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कणकवली पोलिसात संशयित आरोपींच्या विरोधात ४३५ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + seventeen =