You are currently viewing स्मृती

स्मृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी सुभाष उमरकर, सामनगाव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*स्मृती*

सामोरी येता टाळुन गेला तू
असा कसा जाळून गेला तू ..!!

अशीच का लागली ठेस मनाला
काळजात जखमा करून गेला तू…..!!

वाट मोकळीच होती त्या क्षणाला
एकटाच वाटेवर सोडून गेला तू ..!!

अबोल भावना ओथंबुन आल्या
नजरेची भाषा न समजुन गेला तू …!!

पायवाटेवर चे ठसे पुसले जात नाही
वाळूत रेघोट्या ओढून गेला तू …!!

येतो तो काळ निघून जातो
काळजातले घर पाडून गेला तू ..!!

ये पुन्हा मी म्हणणार नाही
आठवणींचे गाठोडे सोडून गेलातू ….!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*

प्रतिक्रिया व्यक्त करा