You are currently viewing शासकीय धान्याची तस्करी करण्याऱ्या सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करा

शासकीय धान्याची तस्करी करण्याऱ्या सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करा

कुडाळ मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी

कुडाळ

गोरगरीब जनतेला रास्त दरात दिल्या जाणाऱ्या शासकीय धान्याची तस्करी करण्याऱ्या रॅकेटशी संबंधित सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुडाळ मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले की, गोरगरीब जनतेसाठी शासकीय रास्त दराच्या दुकानात दिले जाणारे तांदूळ कुडाळ एमआयडीसी येथील बजाज राईस मिलच्या आवारात काल पकडण्यात आले. प्राप्त माहितीनुसार अशा प्रकारे शासकीय गोदामांमधून तांदूळ गोळा करून ते पॉलिश करण्यासाठी बजाज राईस मिल मध्ये नेले जातात व नंतर बाजारात चड्या दराने विक्री केले जातात जाते, अशी माहिती मिळत आहे. हा सर्व प्रकार दुर्दैवी असून अतिशय गंभीर व दखलपात्र आहे. त्यामुळे यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत ते समोर येणे गरजेचे आहे. अगदी सहा-सात महिन्यांपूर्वी धान्याने भरलेला एक पूर्ण ट्रक धान्य गोदामात न जाता परस्पर विक्रीसाठी बाहेर नेण्यात आले अशी कुजबुज गोदाम कर्मचाऱ्यांकडून ऐकीवात आलेली होती. तर रात्रीच्या सुमारास शासकीय धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून दोन पोती एमआयडीसी येथे उतरवून नंतर ट्रक गावोगावी धान्य दुकानांकडे रवाना केला जातो, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.
काल घडलेल्या घटनेनंतर आपण पंचनामा नोंद केल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकार अतिशय भयंकर असल्याने नुसता महसूल विभागाकडून चौकशी प्रक्रियेचा फार्स केल्यास ह्या तस्करीच्या पाठीमागील खरे सूत्रधार आणि अन्य रॅकेट पुढे येणार नाही, त्यामुळे कालच्या प्रकारानंतर बजाज राईस मिल व्यवस्थापना सहित जबाबदार गोडाऊन कर्मचारी आदि दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा जेणेकरून ह्या भष्टाचाराची पोलीस यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होईल व यामागचे पूर्ण रॅकेट समोर येईत, असे निवेदनात नमूद केले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 11 =