You are currently viewing डॉ. संदीप सावंत यांचे जनतेला आवाहन

डॉ. संदीप सावंत यांचे जनतेला आवाहन

सावंतवाडी :

 

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार तसेच डासांमुळे पसरणारे मलेरिया, डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग यासारखे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्या अनुषंगाने पिण्याचे पाणी गाळून, उकळून पिणे व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना करणे, तापसदृश्य आजारांवर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे.

पावसाळ्यात पाणीसाठे वाढून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग यासारखे आजार डासांमार्फत पसरतात.

तीव्र ताप, तीव्र थंडी, डोकेदुखी अंगदुखी, सांधेदुखी, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे या आजारामध्ये आढळून येतात. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित रक्ततपासणी करणे व औषध उपचार घेणे आवश्यक आहे.

डासांची पैदास साठलेल्या व साठवलेल्या पाण्यात होते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे पाणीसाठी नष्ट करणे, साठवलेले पाणी, डबकी वाहती करणे, साठलेल्या पाण्यात ऑईल अथवा गप्पी मासे सोडणे तसेच भंगार साहित्य, टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साठवून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. असे पाणीसाठी नष्ट करावेत मच्छरदाणीचा वापर करणे, खिडक्या, दारे, संडासचे व्हेंट पाईप यांना जाळी बसवणे आदी उपाययोजना कराव्यात व कोणतेही तापसदृश्य लक्षणे असल्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 18 =