You are currently viewing भविष्याचा वेध घेणाऱ्या युवा नेत्याचा वाढदिवस

भविष्याचा वेध घेणाऱ्या युवा नेत्याचा वाढदिवस

महाराष्ट्रातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला,तरुणांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्यसम्राट युवा आमदार *नितेशजी चा वाढदिवस*

म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात तरूणाई चा उत्सव असतो,,,,,,,,,
प्रचंड मोठी राजकीय पार्श्वभूमी
असलेल्या संस्कारित कुटुंबात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला व परदेशात उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण ह्या मातीशी आणि जनतेशी कधी एकरूप झाला हे कळलेच नाही,,,,,, मूळातच आदरणीय मोठ्या साहेबांकडून आक्रमक पणा व अभ्यासु वृत्ती हा वारसा लाभलेल्या नितेशजी नी सर्वसामान्य जनतेच्या हृदयाच्या आतल्या कप्प्यात अढळ स्थान निर्माण केले,,,,,,,,विद्यार्थीदशेत असतानाच नितेशजी नी महाराष्ट्र स्वाभिमान संघटना स्थापन करून महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र केले,व अनेक जनहिताच्या प्रश्नासाठी हि युवा संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करु लागली,,,,आणि बघताबघता नितेशजी नी तरुणांच्या पाठिंब्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपला दबदबा निर्माण केला,,अन्याया विरोधात ठामपणे उभा रहाणारा, सामान्य माणसाला केंद्रबिंदु मानुन समाजसेवा करणारा या महाराष्ट्रात दुसरा युवानेता नाही,आदरणीय राणें साहेबांसारख्या उत्तुंग नेतृत्वाची पार्श्वभूमी असूनही नितेशजी नी वारसाहक्काने पदे मिळावीत अशी कधीच अपेक्षा बाळगली नाही,,त्यांचे नेतृत्व हे संघर्षातून उभे राहुन, स्वतःला सिद्ध केलेले बावनकशी सोन्या सारखे झळाळते नेतृत्व आह,,,,,,,,,संपुर्ण राज्यातील तरुणांना एकत्र करून त्यांच्या भविष्याचा विचार करणारा महाराष्ट्रातील एकमेव असा तरुण नेता आहे,,,,,,,,हा तरुण जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा तुरुंगात गेला जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे जनतेच्या वतीने रस्त्यावर उतरून संघर्ष केला,,माजलेल्या नोकरशाही ला आपल्या अभ्यासु पणाने व निर्भीड पणे वठणीवर आणले तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले,सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून जनतेचे हक्क जनतेला मिळवून दिले,,,,,,,,,,,,,,,,गेली आठ वर्षे हा तरुण आमदार जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हडे अभ्यासु व आक्रमक आमदार आहेत त्यातील सर्वात वरचा क्रमांक नितेशजी चा आहे,,,,,,महाराष्ट्राच्या सुस्त राजकारणात सतत आक्रमक भूमिका घेत राजकारण हालत ठेवण्याचे काम नितेशजी नी केले,,त्यांनी नेहमीच शिवसेनेला तसेच सत्ताधाऱ्यांना सभागृहात व सभागृहाच्या बाहेर घेरण्याचे काम केले,,,,,,,त्याचाच परिणाम आता सत्तापरिवर्तनाच्या दिशेने सुरु झालेला आहे,,येणाऱ्या काहि दिवसातच हा तरुण आमदार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसणार आहे,,,,,,,
,,,,,,,,,,म्हणूनच नितेशजी चा आम्हाला अभिमान आहे,,,अभिमानच नाही तर गर्व आहे !!!!!!!
असे हे अष्टपैलू नेतृत्व,,,, आज अख्खा महाराष्ट्र हया तरुण नेत्याकडे आशेने व अपेक्षेने पहात आहे,,,,,,,,,,,,
दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा नेता म्हणजे कोकणची शान व महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे,,,,खरे तर नितेशजीं च्या कार्य कर्तृत्वा वर लिहायचे झाले तर रकाने च्या रकाने लिहावे लागतील !!!!!!!! *आजच्या वाढदिवसाच्या दिनी त्यांना सिंधुदुर्ग चे भावी पालकमंत्री म्हणून खुप खुप शुभेच्छा* आणि वाढदिवसाच्या शुभदिनी परमेश्वराने त्यांना दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन भविष्यातील उज्ज्वल महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी देवो हिच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏🏻
*शुभेछुक* : *संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*
*सावंतवाडी*,,,, *सिंधुदुर्ग*,,,,,
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + fifteen =