You are currently viewing गढुळ पाण्याने वैभववाडीकरांचे आरोग्य धोक्यात

गढुळ पाण्याने वैभववाडीकरांचे आरोग्य धोक्यात

*वैभववाडी शहरातील पाणी प्रश्नी नागरिक हैराण*

 

वैभववाडी :

 

वैभववाडी शहरात ऐन पावसाळ्यात देखील पाणी पुरवठा एक दिवस आड या पध्दतीने केला जात आहे. शिवाय‌ गेली काही दिवस गढुळ पाण्याचा पुरवठा शहरातील काही भागात सातत्याने होत आहे. याबाबत वैभववाडी मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे यांच्यासह शिष्टमंडळाने देखील काही दिवसांपूर्वी नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारला होता.

परंतु त्याचा काही सकारात्मक परिणाम झालेला दिसून आलेला नाही. शहरातील सुरू असलेल्या गढुळ पाण्याच्या पुरवठ्याने साथीच्या आजारांना आमंत्रण देऊन वैभववाडी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ्य बिघडल्यावर स्थानिक प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा