You are currently viewing काळजी

काळजी

 

*’काळजी करणे’ हा माणसाला जडलेला एक रोग आहे.काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तर माणूस काळजी करतोच,पण काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरी माणूस काल्पनिक भयगंडाच्या आहारी जाऊन काळजी करीत बसतो.भुंगा जसा लाकूड पोखरतो त्याप्रमाणे काळजीरूपी भुंगा माणसाचे जीवन पोखरीत असतो.काळजी करण्यानं नसलेले रोगसुद्धा निर्माण होतात.बुडत्याचा पाय जसा खोलात जात असतो,त्याप्रमाणे काळजी करणाऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत असते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत काळजीला सोडचिठ्ठी देणे अत्यंत आवश्यक आहे.*

 

🎯 *काळजी घ्यावी अवश्यकाळजी करू नये मुळीच.*

 

🎯 *भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता या दोन्ही बाजूस सारून जो केवळ वर्तमानकाळात स्थिर रहातो तो स्थितप्रज्ञ.*

 

🎯 *काळजी ही स्वरूपाला झाकणारी काजळी आहे.*

 

🎯 *काळीज द्या देवाला,मग तुमची काळजी देवाला.*

 

🎯 *वेळीच जे काळजी घेतात त्यांच्यावर काळजी करण्याची वेळ क्वचितच येते.*

 

🎯 *काळजी करण्याने जीवनातील समस्या सुटत तर नाहीतच,उलट त्या अधिकच उग्र स्वरूप धारण करतात.*

 

🎯 *काळजी केल्याने ‘काळ’ माणसासमोर ‘जी’ म्हणून हजर रहातो.*

 

🎯 *काळजी म्हणजे प्रत्यक्षात मानवी जीवन फस्त करणारी वाळवीच होय.*

 

🎯 *’शुभ चिंतन व ईश्वर चिंतन’ हे काळजी या रोगावर रामबाण उपाय आहेत.*

 

🎯 *काळजी म्हणजे जीवनरूपी दिव्यावर पसरणारी काजळी होय.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा