You are currently viewing आत्मनिर्भर भारत संघटना भाजप जिल्हाध्यक्ष आशिष नाबर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

आत्मनिर्भर भारत संघटना भाजप जिल्हाध्यक्ष आशिष नाबर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

आत्मनिर्भर भारत संघटना भाजप जिल्हाध्यक्ष आशिष नाबर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा प्रधानमंत्री आत्मनिर्भर संघटना भाजपचे जिल्हाध्यक्ष आशिष मुकुंद नाबर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश संघटक सचिव शेखर माने यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करुन भाजपला जोरदार धक्का दिला,ते म्हणाले की भाजपमध्ये जनतेचे भले करण्यासारखे कोणतेच निर्णय होत नाही फक्त जनतेच्या मुलभूत सुविधा पासून लक्ष विचलित करण्यासाठी अनेक खोटे नाटे आरोप करून महागाई बेकारी सारख्या विषयावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा सतत प्रयत्न करून जाती धर्माच्या नावाखाली तरूणांना भडकविणे यासारखे जनतेमध्ये बुद्धीभेद करून वातावरण बिघडवण्याचे एक कलमी कार्यक्रम राबवतात, यासर्व प्रकारांनी मी त्रस्त होऊन भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, आणि सर्व धर्म समभाव आणि जनतेच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज मी जाहीररीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे,

भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांना हीन दर्जाची वागणूक मिळते कोरोना कालावधीत माझी आई मयत झाली,पण भाजपचा कोणीही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते भेटायला आले नाहीत, अशा भयावह परिस्थितीचा सामना भारतीय जनता पक्षात करावा लागतो, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अनेकवेळा कार्यक्रमाला बोलावले तर कुणीही सहकार्य केले नाही,मी स्वता शरद पवार साहेबांच्या विचारावर प्रभावीत असून अमित सामंत यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश केला, यापुढे जिल्हाध्यक्ष यांच्या सहकार्याने सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष संघटनेचे काम करून संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीन, यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रदेश संघटक सचिव शेखर माने,काका कुडाळकर सरचिटणीस भास्कर परब बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रीक,अर्चना घारे, निलेश गोवेकर, अनंत पिळणकर, अभिनंदन मालणकर, सावळाराम अणावकर शिवाजी घोगळे, यांचे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + eight =