You are currently viewing आघाडी सरकार करतय नसते उद्योग : माजी आ. प्रमोद जठार

आघाडी सरकार करतय नसते उद्योग : माजी आ. प्रमोद जठार

सिंधुदुर्गातील आयुर्वेद संशोधन केंद्रास (NIMP) आडाळी दोडामार्गात जागा देण्याचे सोडुन लातुर ला पळवण्याचा आघाडी सरकारच्या वैद्यकीय मंत्र्याचा नसता उद्योग …

कणकवली :

आडाळी एमआयडीसी येथे शंभर एकर जागेमध्ये केंद्रीय आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्र (NIMP) करण्याबाबत केंद्र सरकार चे आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी मंजुरी दिलेली आहे. मात्र राज्य सरकार कडून ही जागा हस्तांतरण होण्याची गरज असताना ती प्रक्रिया करण्यास राज्य सरकारचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंजुरी द्यायचे सोडुन सदर केंद्र लातुर येथे जागा देतो लातुर ला करा असा प्रस्थाव केंद्रसरकारला पाठवला असल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली.
याबाबत श्री जठार म्हणाले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी हे आयुर्वेद संशोधन केंद्र मंजुरीसाठी आपण वारंवार पाठपुरावा करीत आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारी साडेतीनशेहून औषधी वनस्पतींच्या पार्श्वभूमीवर हे आयुर्वेद संशोधन केंद्र सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील आडाळी एमआयडीसीच्या जागेत करणे सोयीचे ठरणार आहे. मात्र राज्य सरकारचे मंत्री सिंधुदुर्गसाठी अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. केंद्र सरकार ने आडाळी येथे जागा द्या ताबडतोब आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू करण्यात येइल सहमती दर्शवली मात्र सकारात्मक असे पत्र दिले असताना याबाबत राज्य सरकार केवळ जमीन हस्तांतरण प्रक्रिया करणे बाकी असतानाही याकडे दुर्लक्ष करून हे आयुर्वेद संशोधन केंद्र लातूर येथे नेण्यासाठी अमित देशमुख का आग्रही आहेत ? मुळात या लातूरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, औषधी वनस्पतींची वानवा आहे अशा ठिकाणी हे संशोधन केंद्र नेऊन राज्य सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे?असा सवाल श्री जठार यांनी उपस्थीत केला आहे. जर महाराष्ट्रात दोडामार्ग येथे मंजूर असलेले संशोधन केंद्र कार्यान्वित झाले नाही तर ते महाराष्ट्रात कुठेही करु नका इतर राज्यांत घेउन जा अशी विनंती श्री.जठार यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना केली आहे. राज्यसरकार सिंधुदुर्ग वासियांची हेटाळणी करत असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे हा निर्वाणीचा इशारा असे समजा मुख्यमंत्री व जिल्ल्हयातील आमदार यांनी तातडीने लक्ष घालुन जागेची मंजुरी द्यावी अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे प्रमोद जठार यांनी संगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 9 =