You are currently viewing सुप्तरंग

सुप्तरंग

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो. डॉ.प्रवीण उर्फ जी आर जोशी यांचा अप्रतिम लेख

सुप्तरंग

(जागतिक कविता दिनानिमित्य )

होय एकदम अंगात येत! अंगात संचार होतो! शरीर झपटल्या सारख होत ! झाड मुळा पासून हालत गदा गदा हलायला लागत . पाने थर थर कापतात, वेळ काळ याच भान रहात नाही, मग चालू होतात प्रसव वेदना ! ते ही एका विलक्षण अवस्थेत !
डोक गरगरत , मेंदू झोपेत ही तल्लख होतो, कोण तरी उठावत आहे असा भास होतो . त्यातून फक्त ब्रह्मस्वरूप उजेड बाहेर पडतो . अगदी झोपेत
सुद्धा चालु होतात नियतीशी खेळ . ” “धी धृति स्मृति ” जागृत होतात, थैमान घालत , वादळ घोंगवणार, समुद्र मन्थनाच काम चालु होत . धि धृति शी सांगड घालते धृति म्हणजे सन्कल्प जो सिद्ध होणार असतो .
धी धृति स्मृति शी सलग्न होते .मग फेर धरून नाचु लागतात ,अनेक स्मृती !
स्मृति। चाळ वल्या जातात .त्या धृति शी गप्पा मारू लागतात , नंतर
कार्य सिद्धीला। माँ सरस्वतीला पाचारण करतात .
मग काय तप्त तव्यावर, राजगिरा टाकावा, तश्या शब्दांच्या लाह्या तड़ तडू लागतात , शब्द फेर धरतात , शब्द मन्थना तुन अनेक शब्द , जे आहत अनाहत नाद घेवून येतात .
त्याला सरस्वतीचा वरद हस्त लाभला की , अलंकार असावे असे मोत्याचे दाणे लगडून बरसतात . जसा पत्थरला पाझर फुटावा , तसे शब्द शब्दाला
मिठीत घेवून नाचु लागतात !
खरी प्रसव वेदना एथेच चालू होते !!
स्मृतितल्या, घटात – घटित अघटित , काल्पनिक जगात वावर चालू होतो . मग सुगरण कशी घरटे विणते , तसे अक्षरांचे जाळे विणले जाते. त्यातूनच कवितेला जन्म घ्यावे लगते . भाव हे भावनेच सगुण साकार उत्कट रूप !
ती उस्फुर्त ता आर्त किंकाळी ने बाहेर पड़ते . निर्गुण निराकार , सगुण साकार अश्या दोन्ही स्वरुपात मूर्त रूप आकर घेते . आकार घेत असताना , त्याला अलंकार धारण करण्याची उपजत बुद्धी येते ! अश्या सालंकार सरस्वतीचे दर्शन घेत, असता साग्र संगीत षोडशोपचार अभिषेक करीत आहोत असे परेला भासते .
(परा पश्यंती मद्धमा वैखरी )

परा ही अंतर देवता ! त्यापासून तयार होणारा प्राण, पश्यंती मध्यमा व्यान वायुचे कार्य करत , धृति जागृत करतात ,त्यातून अभ्यन्तर वैखरी मस्तिष्क मधे येवून बसते . नंतर अपान वायु रुपात हस्त लिखीत स्वरुपात प्रगट होते ! त्यालाच तर व्यक्तता म्हणतात . तीचे स्वरूप कसेही सगुण साकार निर्गुण निराकार , असोत
त्यालच आपण प्रतिभा मानतो का ?

जरी तसे मानले तरी त्यामधे ओज असणे , ओजस्विता येणे , हे जरी प्रतिभाधीन असले, तरी त्याला नियती शी , सामोरे जावे लागते , ती जशी व्यक्त होईल तसे त्यातून ब्रह्मस्वरूप आनन्द मिळतो! “मी माझेपण ” गळून पड़ते .
अहंकार सुख दुःख षड् रिपु ह्यांच्याशि देणे घेणे लागत नाही !!
आत्मा सच्छिदानन्द स्वरूप , पञ्चरूपाशी पंच महाभूताशी एकरूप होऊन ,पांच भौतिक सुखासाठी लागणा रे ,
विषय – शब्द स्पर्श रूप रस गन्ध
पाझरु लागतात !! अतिउच्च तन्मात्रा ह्या प्रकृतिशि एकरूप झाल्या की, शब्दांचे फुलोरे मनोरे कांगोरे दिसाव्यास लागतात .
हे सर्व अचानक असत म्हणूनच त्याला “प्रतिभा “म्हणतं असावेत !!
उस्फुर्तता कोणत्याही स्वरुपात प्रगट होते. मग ते साहित्य असो वां संगीत ,वा नाट्य कला क्रीड़ा, इत्यादि ती सदैव जागृत च रहाते, ती उपजत असते .
प्राज्ञावन्त , अभ्यासक, लेखक, पत्रकार, ज्ञान वन्त मग तो कोणीही असो , त्याची सरस्वतशी
नाळ जोडली जाते .. किंबहुना ते सरस्वतीच्या दरबरातील ते भाट ठरतात ! त्यामधे एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पञ्च भूते, त्याचे विषय — शब्द स्पर्श रूप रस गन्ध हयाविषयांचे अनुभव प्रगल्भ् असले पाहिजेत .
त्यानुसार धी धृती स्मृति यांची, सांगड घालता आली पाहिजे.
महत्वाचे म्हणजे मन व् आत्मा जागृत ठेवला पाहिजे . तो त्या कला आकृती त दिसला पाहीजे .
मनाचे अधिष्ठान मस्तिष्क, तर आत्मा ह्रदया स्तिथ, दोन्ही गोष्टी अस्थिर ! त्यात मनाचे चलन वलन
मारुत तुल्यम् वेगम , त्याला वष करून कार्य सिद्धीस गेले पाहिजे .
विचार वन्ताला हे विवेचन योग्य आहे .
पण सामान्य माणसा चे काय तो प्रतिभावन्त नाही ?माझ्या मते श्रुष्टीतील चराचर जीव् प्रतिभावान आहे . पशु पक्षी ,क्षुद्र कीटक ,फुले पाने पखरापासून काजव्या पर्यन्त , त्याना उपजत ईश्वरी देणगी आहे , मोर मोर पिसारा त्याचे नाचणे, त्याच्या पंखावरचे नैसर्गिक रंग, फूल पाखरे त्यांचे रंग ,त्यातील कला कुसर हे, काय आहे ?
साधा अडाणी शेतात राबणारा शेतकरी, ही सर्व सृजनात्मक रचनाकार आहेच की ! जेथे जेथे सृजन आहे तेथे तेथे पञ्च भुता चा पाझर आहे ! पञ्च विषयांचा कारक आहे , तो निमित्य कारण का होईना प्रतिभावान आहे .. मग ते
कुम्भराचे मडके असो , वा सुतराचे लाकड़ी कोरीव काम !असो
पाथर वटाचे दगडा वरील लेणी नक्षी, वा गवण्ड्याचे स्थापत्य कला शास्त्र असो ह्या बाराबलुतेदारांची सृजनात्मक कल्पना ! निर्मिती ही त्या त्या कलेस पूरक ठरते च .
अंजिठा वेरूळ ची लेणी असो , दक्षिणेतिल गोपुर पद्धतीची मन्दिरे, असोत, पट्ट द कल्ल येथे तर मन्दिर प्र शिक्षण संस्थाच होती. बेलूर हळे बीड येथे तर दगडातील जीवन्त प्रतिमा व् प्रतिभा ओतप्रोत ठासून भरलेली दिसून येते !!! रामायण महा भारत , वात्सायन यांचे महा काव्य दिसून येते , असाच अचर ठेवा विविध वनस्पति वेली वॄक्ष ह्यांच्या ठेवणी बंध ह्यांचे शास्त्र सांगणे कठीण होते .
त्यांचे विविध आकर फुले त्यांचे रंग त्यांची रचना जीवनक्रम ह्या, निसर्गदत्त नियमाने ओसांडून वहात असते . काहीना सुंगध काहीना उग्र वास , उदाहरणे भरपूर आहेत विवधता ही आहे .
मानवि जीवनाशी ह्या सर्व गोष्टींची नितांत गरज आहे . किंबहुना जीवन हे एक प्रकारचे प्रतिभावान आहे ! ते कोणाला टाळता येणार नाही .
त्याचा अस्वाद कोणी कसा घ्यावा, हे ज्याचे त्यांनीच ठरवायचे असते .
म्हटल तर प्रतिभा -निसर्ग सृजन ह्या गोष्टी एक असावेत असे वाटते .
त्या हातात हात घालुन च येतात
तुर्थ मी इथेच थांबतो .

प्रो डॉ जी आर प्रविण जोशी

अंकली / बेळगांव

कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 10 =