You are currently viewing इयत्ता ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु करणार….

इयत्ता ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु करणार….

मुंबई प्रतिनिधी:

कोरोना मुळे राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार या बद्दल अद्याप काही स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. शिवाय, ऑक्टोबरपासून इयत्ता ९ ते १२चे कार्यक्रम कधी प्रक्षेपित केले जाणार?याबाबत लवकरच वेळापत्रक सुद्धा जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
१५ जूनपासून शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जात असताना विद्यार्थ्यांना दूरदर्शनद्वारे घराघरांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मे-जून महिन्यापासून राज्याच्या शिक्षण विभागाकडून दूरदर्शनकडे वेळ मागण्यात आलेली होती. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत पत्र लिहून दूरदर्शनकडून वेळ मिळावी अशी विनंती ही केली होती.
केंद्राने इयत्ता ९ वी ते १२ वी शाळा २१ सप्टेंबर पासून शाळा सुरु करण्याबाबत गाईडलाइन्स जाहीर केल्या असताना २१ सप्टेंबरपासून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार नसल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर शाळा सुरु होईपर्यंत या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे.
पहिल्या टप्यात इयत्ता नववी ते बारावी आणि त्यानंतर टप्याटप्याने इतर वर्गासाठीही दूरदर्शनची वेळ घेऊन कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करणं अवघड असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत शिक्षण विभाग आणि संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला होता. म्हणून आता शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eleven =