You are currently viewing सावंतवाडी शहराला निश्चितच पुन्हा सुखाचे दिवस येतील – बबन साळगावकर

सावंतवाडी शहराला निश्चितच पुन्हा सुखाचे दिवस येतील – बबन साळगावकर

केशवसुत कट्ट्यावरील नव्या तुतारीच्या कामाचा शुभारंभ…

सावंतवाडी

शहरात पुन्हा एकदा सुखाचे दिवस येतील. त्यादृष्टीने आता वाटचाल सुरू झाली आहे. नागरिकांच्या इच्छेप्रमाणे पुढील निर्णय होणार आहे, असे मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे व्यक्त केले. नव्या तुतारीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकवर्गणी जमा झाली आहे. त्यातील मोठा वाटा आमदार दीपक केसरकर,माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांनी उचलला आहे. असे त्यांनी सांगितले येथील केशवसुत कट्ट्यावर असलेली तुतारी आता नव्याने उभारण्यात येणार आहे.त्याचा शुभारंभ आज श्री साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, संजय पेडणेकर, मुकुंद वझे, दत्तप्रसाद गोठसकर, शिवप्रसाद कुडपकर, डॉ. मधुकर घारपुरे, अर्षद बेग, शर्वरी धारगळकर, काका सावंत, किर्ती बोंद्रे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − thirteen =