You are currently viewing ओव्हरलोड खडी वाहतूक तात्काळ बंद करा –  सुभाष राणे यांची मागणी

ओव्हरलोड खडी वाहतूक तात्काळ बंद करा –  सुभाष राणे यांची मागणी

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात ओव्हरलोड खडी वाहतूक होत आहे. राजरोसपण असे अशी वाहतूक सुरू असून, याबाबत आरटीओने कारवाई कारवाई करावी अशी मागणी निगुडे गावचे ग्रामस्थ सुभाष राणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून ओव्हरलोड खडी वाहतूक राजरोसपणे सुरू असून, याबाबत मात्र संबंधित विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप सुभाष राणे यांनी केला आहे.

आपल्या गाडीला गावात येऊन दंड आकारला गेला. मात्र, महामार्गावरून जाणाऱ्या गाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप करत राणे यांनी आपल्यावरील कारवाई एकतर्फी असल्याचं म्हटलंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =