You are currently viewing भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा

भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा

भारतातील शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या २७ सप्टेंबरच्या
भारत बंदला जिल्हा काँग्रेस कडून जाहीर पाठिंबा देत,केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा असे निवेदन कणकवली तालुकाच्या
वतीने माननीय तहसीलदार श्री. आर.जे.पवार यांना देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत , कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर,नादीरशहा पटेल, प्रदीप तळगावकर, संतोष तेली, चंद्रकांत पवार, कमलाकर तांबे, अब्दुल काझी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 13 =