You are currently viewing गौरी गणपती सणाच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्यास मोर्चा

गौरी गणपती सणाच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्यास मोर्चा

– अजित नाडकर्णी यांचा इशारा

गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट मध्ये विजेचा लपंडाव होऊ नये, याची काळजी वीज वितरण कंपनीने द्यावी अन्यथा व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल,असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.
कोकणात गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपती सणाच्या काळात विजेचा लपंडाव होऊ नये अशी गणेश भक्तांची भावना असते. वीज गेल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे वीज वितरण कंपनीने विजेचा लपंडाव होऊ नये यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा व्यापाऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 11 =