You are currently viewing अखेर सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…!!!

अखेर सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…!!!

कणकवली :

अखेर कणकवली नगरसेवक विरोधी गटनेता सुशांत नाईक यांच्या मागणीला मिळाले यश.कणकवली शहरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यू बाबत विचार विनिमय करण्याबाबत च्या बैठकीचे आयोजन करण्याची मागणी त्यांनी केली होती.त्यानुसार आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्वपक्षीय लोक प्रतिनिधी, व्यापारी, आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी ची बैठक बोलावली होती.आजच्या बैठकीत कणकवली शहरात 8 दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने झाला.नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी शहरातील कर्फ्युला व्यापारी वर्गाने, लोकप्रतिनिधीनी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने मान्यता दिली.वैयक्तिक व्यवसायापेक्षा ग्राहकांचे आरोग्य महत्वाचे मानणाऱ्या व्यापारी बंधूंचे सुशांत नाईक यांनी आभार मानले. आजच्या निर्णयानुसार 8दिवस कडकडीत कर्फ्यु पाळून कणकवलीतील
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 11 =