You are currently viewing महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- ना.दादाजी भुसे

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- ना.दादाजी भुसे

कुडाळ येथे रिसोर्स बँकमधील शेतकऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद

कुडाळ

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी असून शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात शेतीसह अन्य पिकांचे भरघोस उत्पन्न घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी. चालू वर्षी खरीप हंगामात खतांचा पुरवठा कमी पडू देणार नाही. सर्वत्र खतपुरवठा मुबलक प्रमाणात केला जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कुडाळ येथे दिली.

कुडाळ एमआयडीसी येथील बांबू – चिवार केंद्रात विकेल ते पिकेल’ योजने अंतर्गत जिल्हा कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या ‘रिसोर्स बँकमधील शेतकरी संवाद कार्यक्रमात ना. भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरीप हंगामाचा आराखडा बनविण्याच्या कामी आढावा म्हणून शेतकऱ्यांची मते त्यांनी जाणून घेतली.आंबा काजू तसेच खरीप हंगामातील समस्या उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.कोकणातील चार जिल्ह्यांची बैठक रत्नागिरी येथे होत असून या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्यांसंदर्भात उपाययोजना करण्याचे त्यांनी आश्वासित केले.आ.वैभव नाईक यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. *कुडाळ तालुका कृषी विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या अल्बमचे प्रकाशन यावेळी ना.भुसे व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प.गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, कृषिमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रफिक नाईकवडी व सुधाकर बोराळे, कॉनबॅक संचालक मोहन होडावडेकर, जिल्हा कृषी अधिकारी सिद्धाण्णा म्हेत्रे, सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी प्रवीण कोळी, तहसीलदार अमोल पाठक, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, पं.स.कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, शेतकरी सल्ला समिती कुडाळ अध्यक्ष बाजीराव झेंडे, मंडळ कृषी अधिकारी एस. बी. दोलताडे आदींसह जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =