You are currently viewing सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अरेरावीचे उत्तर जनता मतपेटीतून देईल

सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अरेरावीचे उत्तर जनता मतपेटीतून देईल

युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर टिका

सावंतवाडी

शहराची जिल्ह्यात शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख आहे. परंतु सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवक यांची पालिकेत चाललेले अरेरावीची भाषा ही अतिशय निंदनीय आहे. पालिकेत सभागृहाचा चाललेला अवमान याचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करत आहोत. असे मत नवनिर्वाचित युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी व्यक्त केले आहे. असा इतिहास सावंतवाडीचा नाही आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. अती तिथे माती होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत जनताच जागा दाखवून देईल व जो अन्याय स्टॉलधारक, भाजी विक्रेत्यांवर होत आहे याचा सूड मतपेटीतून दिसेल अशी सनसनीत टीका युवासेनेचे नवनिर्वाचित शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केली आहे. यावेळी पालिकेच्या विषयात बाहेरून आलेले उपरे नाक खुपसत आहेत त्यांचा सावंतवाडी नगरपरिषदेची संबंध काय? त्यांना ओळखतो कोण? असा सवाल श्री सावंत यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =