You are currently viewing रेल्वेच्या धडकेत पाच म्हैशींच्या उडाल्या चिंधड्या

रेल्वेच्या धडकेत पाच म्हैशींच्या उडाल्या चिंधड्या

– वैभववाडी मधील घटना

वैभववाडी

रेल्वेच्या धडकेत पाच म्हैशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना वैभववाडी रेल्वे स्टेशन ते कणकवली रेल्वे स्टेशनच्या दरम्यान घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅकवरुन पाच म्हैशी चालत होत्या. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची या म्हैशींना जोरदार धडक बसली. या धडकेत म्हैशींच्या चिंधड्या उडाल्या आहेत. दरम्यान घटना घडताच रेल्वे काही काळ घटनास्थळी थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र या घटनेत त्या अज्ञात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − three =