*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९७ वे
अध्या – १७ वा , कविता – १ ली
__________________________
श्री गजानन विजय रसाळ गाथा । श्री दासगणू सांगती दिव्य कथा । श्री गजानन चरणी ठेवू माथा । भक्तिभावे ।। १।।
दासगणूंचे सविस्तर विवेचन ।गजानन चरित्राचे निरूपण ।
त्याचेच हे संक्षिप्त काव्य-निवेदन । करी कवी अरुणदास ।।२।।
श्री गजाननांच्या भेटी-गाठी । असती गावोगावच्या भक्तांसाठी । त्यांच्याच कल्याणासाठी । माऊली करिती प्रवास ।। ३ ।।
भेटण्या परमभक्तांस । स्वामींचे येणे खास । अकोल्यास ।
हमेशा होई ।। ४ ।।
म्हणे शिष्य भास्कर । स्वामी चला मलकापूर । विष्णुसा विनंती वरचेवर । करी मजला ।। ५ ।।
भास्करास स्वामी म्हणती । तू नको करू विनंती । नको
हा आग्रह अती । आता नको जाणे मलकापूर ।। ६ ।।
तरी भास्कर नाही थांबला । पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला । स्वामी, मी शब्द विष्णुसाला दिला । येईन तुम्हास घेऊन मलकापुरा ।।७ ।।
************************************
करी क्रमशः लेख कवी अरुणदास
___________________________
कवी- अरुणदास ” अरुण वि.देशपांडे
___________________________