दिल्ली :
भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावपूर्व वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि बीसीसीआय चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तणावपूर्ण वातावरणामुळे सुरक्षा पथकांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.
यंदाच्या आयपीएल मध्ये ७० साखळी सामने, दोन पात्रता सामने अर्थात क्वालिफायर, एक बाद फेरीचा सामना अर्थात एलिमिनेटर आणि अंतिम सामना अर्थात फायनल असे एकूण ७४ सामने खेळवण्याचे नियोजन होते. त्यापैकी ५८ वा साखळी सामना सुरू असताना धर्मशाला येथे ब्लॅकआउट करण्यात आले. यावेळी खेळाडूंना सुरक्षित रित्या हॉटेलवर पाठवण्यात आले. प्रेक्षकांनाही स्टेडियम सोडून शांतपणे घरी जाण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय झाला.