You are currently viewing १७ वर्ग मैत्रिणींचा दुर्देवी अपघात..

१७ वर्ग मैत्रिणींचा दुर्देवी अपघात..

ट्रक आणि मिनी बसच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

कर्नाटक :

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे अवघा देश हळहळला. आपापल्या आयुष्यामध्ये स्थिरसावर झालेल्या या जुन्या शाळकरी मैत्रीणींची बऱ्याच वर्षांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट घडून आली होती. पुढे या सर्वांनी ‘गेट-टुगेदर’साठी एकत्र गोव्याला जायचा प्लॅन केला . मात्र प्रवासादरम्यानच त्यांच्यावर काळाने घाला घातला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड बायपास रोडवर मिनीबसच्या ट्रकने समोरासमोर धडक दिल्याने १३ जण ठार आणि ८ गंभीर जखमी झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सर्व १३ महिला वर्गमैत्रिणी असल्याचे समजले. या सर्वजणी दरवर्षी सहलीला जात होत्या. यावर्षी त्यांनी गोव्यात जाण्याची योजना आखली होती आणि त्यातील एक डॉक्टर होती,असे पोलिस तपासात संध्याकाळी सांगितले. दावणगेरे येथील सेंट पॉल कॉन्सेंट  या एकाच कॉलेज मध्ये शिकलेल्या १७ महिलांचा गट मिनीबस मधून गोव्याला सहलिकरता निघाल्या होत्या.

दोन्ही वाहनांचे चालकही मरण पावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना हुबळी येथील स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. संध्याकाळी, जखमी झालेल्या प्रवाशांपैकी एक – ४७ वर्षीय महिला – यांना बेंगळुरू येथे हलविण्यात आले.

दरम्यान, या भीषण अपघातातून बचावलेल्या आशा जगदीश बेतुर यांनी अपघाताची भयकथा सांगितली आहे. ‘जेव्हा अपघात झाला तेव्हा मी सर्वात शेवटच्या सीटवर झोपले होते. अपघातामुळे बसलेल्या जोरदार धक्क्याने मी काही वेळासाठी बेशुद्ध झाले.

अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी सांगताना आशा बेतुर म्हणतात, ‘जेव्हा मी उठले तेव्हा स्वतःला सावरत माझा मोबाईल हाती घेतला. आम्ही धारवाड जवळ जेथे नाश्त्याला थांबणार होतो तेथे माझी चुलत बहीण मला भेटणार होती. तिला फोन करून मी घडलेली घटना सांगितली. ती आणि तिचे मित्र लगेचच मदतीसाठी धावून आले. मात्र अपघात एवढा भयानक होता कि पोलिसांनी मदतकार्य सुरु केल्यानंतरही त्यांना माझ्यापर्यंत पोहचायला बराच वेळ लागला. माझ्यासह अपघातात जखमी झालेल्या इतरांना पोलिसांना रुग्णालयात दाखल केलं.’

आशा बेतुर या भीषण दुर्घटना झालेल्या ‘त्या’ मिनी-बसमधून आपल्या अन्य १६ मैत्रिणींसह प्रवास करत होत्या. बसमध्ये २ ड्रायव्हर देखील होते. हा अपघात एवढा भीषण होता की, यातील ११ महिला व २ ड्रायव्हर जागीच ठार झाले. बचावलेल्यांपैकी आशा वगळता इतरांची प्रकृती गंभीर आहे.

‘आमच्यापैकी जवळपास सर्वच एकमेकींना शाळेत असल्यापासून ओळखत होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलो. दावणगिरी येथे आम्ही भेटत असू ट्रीपलाही जात असू. मात्र यावेळी आम्ही गोवा येथे रिसॉर्ट बुक केला होता. आम्ही रस्त्यात धारवाड जवळ नाश्त्यासाठी थांबणार होतो मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात घडला.’ त्या सांगतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 8 =