You are currently viewing बर्ड फ्लूदरम्यान अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का?

बर्ड फ्लूदरम्यान अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का?

 

वृत्तसंस्था:

२०२० या वर्षात जगभरातील देशांसह भारतातही विविध नकारात्मक घटना घडल्या. कोरोना व्हायरसपासून ते अर्थव्यवस्था अपंग होण्यापर्यंत मानवजातीने अनेक आव्हानांचा सामना केला. आता नव्या वर्षात म्हणजेच २०२१च्या सुरूवातीलाच भारतावर बर्ड फ्लूचा धोका आहे. दिल्ली, पंजाब आणि राजस्थानसह भारतातील ९ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे इन्फेक्शन पोहोचले आहे. बर्ड फ्लूचे इन्फेक्शन रोखण्यासाठी पक्ष्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यातच मांसाहारी लोक जे अंडी तसेच चिकनचे सेवन करतात ते मात्र त्रस्त आहेत. त्यांना हे समजत नाही आहे की बर्ड फ्लूदरम्यान अंडी अथवा चिकनचे सेवन केले पाहिजे की नाही.

 

माणसांसाठी किती धोकादायक आहे बर्ड फ्लू

एव्हियन फ्लू एक धोकादायक इन्फेक्शन मानले जाते ते पक्षांच्या मलातून अथवा इतर दुसऱ्या माध्यमातून माणसांमध्ये येऊ शकते. दरम्यान, हे इन्फेक्शन एका माणसाकडून दुसऱ्याकडे पसरत नाही. जगात फार कमी केसेस घडल्या आहेत. जर माणूस या इन्फेक्शनने पीडित झाल्यास तर त्या व्यक्तीमध्ये खोकला, सर्दी, छातीत दुखणे अथवा घसा दुखणे ही लक्षणे दिसू लागतात. या समस्या वाढल्यास हे खूप हानिकारक ठरू शकते. लोकांमध्ये हे इन्फेक्शन चिमण्यांची अंडी आणि पक्ष्यांचे मटण खाल्ल्याने पसरू शकतात.

विज्ञानानुसार अंडी आणि पक्ष्यांचे मटण कोणत्याही निरोगी व्यक्तीच्या शरीरात जाण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. जर चिमण्यांपासून मिळवलेले खाद्यपदार्थ नीट धुवून आणि चांगले शिजवून खाल्ल्यास ते कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेचे असे म्हणणे आहेकी पक्ष्यांचे मटण अथवा पोल्ट्रीमधून मिळवलेले मांस चांगले शिजवल्यास त्यातील सगळे जंतू, व्हायरस मरून जातात. जे लोक मांसाहार करतात त्यांनी ही पद्धत जरूर लक्षात ठेवली पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 20 =