You are currently viewing भारताची पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्झिनची शेवटची तिसरी चाचणीही यशस्वी

भारताची पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्झिनची शेवटची तिसरी चाचणीही यशस्वी

 

भारताची पहिली स्वदेशी लस कोव्हॅक्झिनची शेवटची तिसरी चाचणीही यशस्वी झाली आहे.लसनिर्माता भारत बायोटेकने ही माहिती दिली आहे. कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच लसीची तिस-या टप्प्यातील चाचणीही यशस्वी होणे ही भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. भारत बायोटेकने तिच्या कोव्हॅक्झिन या लसीच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील चाचणींचा अहवाल कंपनीने याआधी जारी केला होता.

पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचे दिसून आले आहे. तर दुस-या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आणि ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. लस वर्षभरासाठी प्रभावी ठरत असल्याचा दावा.

तिस-या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच लसीला मंजुरी दिल्याने अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आले होते. लसीची सुरक्षितता आणि प्रभावाबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र आता तिस-या टप्प्यातील चाचणीही यशस्वी झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.ही लस ६ ते १२ महिने सुरक्षा देऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + thirteen =