You are currently viewing विवाहितेवर प्राणघातक हल्ला…

विवाहितेवर प्राणघातक हल्ला…

रत्नागिरी:

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रत्नागिरी घडली. पोटात दोन वेळा चाकू खूपसून तिचा गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती अमोल देसाई याला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे.

माळनाका परिसरात ही घटना घडली. अमोल हा आपल्या पत्नीवर संशय घ्यायचा. त्यामुळे ती माहेरी गेली होती. अमोल तिला मेसेज करायचा, तिने मेसेज करू नको, मुलाचा दाखला आणून दे असे सांगितले होते. त्यानंतर पैसे देण्याचा बहाणा करून अमोल याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − one =