You are currently viewing संतप्त शेतकरी बांधव भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

संतप्त शेतकरी बांधव भगिनींचा भर बांधावरती, भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश

वेंगुर्ला :

गेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नेते आदरणीय मा.शरदचंद्र पवार साहेबांवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांनी जाहीर प्रवेश केला. भर बांधावर, भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा प्रवेश पार पडला. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार. सरकारला कशी जाग येत नाही ते बघूच असा इशारा सौ‌ अर्चनाताईंनी यावेळी दिला आहे.

तालुक्यातील आसोली गावच्या सक्राळ वाडीमध्ये पन्नास एकर क्षेत्र सुपीक जमीन आहे. त्याच्या शेजारी ओहोळ वाहत आहे. त्या ओहोळाचे पाणी पाऊस पडल्यानंतर शेतीमध्ये येऊन शेती करण्यासाठी व्यत्यय येतो. त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांच होते. त्यांच्या उपजीविकेचे साधनच शेती आहे. आठ वर्षेप्रस्ताव, पाठपुरावा करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकप्रतिनिधींकडून देखील दखल न घेतली गेल्याने शेतकरी वर्गाने आदरणीय मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये अर्चनाताईंच्या उपस्थितीत भर बांधावर, भर पावसात जाहीर प्रवेश केला. अर्चनाताईंच काम बघता त्यांच्या मागे आम्ही उभे राहीले आहोत. त्या आमच्या शेतकरी बांधवांना न्याय देतील, त्यांच्यासाठी लढतील असा आम्हाला विश्वास आहे असे मत प्रवेश करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले.

 

सौ. अर्चनाताई म्हणाल्या, शेतामध्ये भर पावसामध्ये, भर बांधावर आदरणीय पक्षप्रमुख मा. शरदचंद्र पवार साहेबांवर विश्वास ठेवून ही मंडळी जाहीर प्रवेश करत आहेत. हा राष्ट्रवादी परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे. आमच्या परिवारात शेतकरी बांधवांच स्वागत करते. यापुढे तुमची अडचण ती आमची अडचण आहे. तुमच्यासाठी उपोषण करू, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. पण, शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देऊ अस प्रतिपादन सौ. अर्चनाताई घारे परब यांनी केले. शेतकरी नाराज आहेत. ८ वर्ष सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत ते आहेत. अन्याय होत असताना अधिकारी, प्रशासनाला जाग येत नाही. न्याय मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी बांधावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ, सरकारला कशी जाग येत नाही ते बघू असा इशारा अर्चनाताईंनी यावेळी दिला. यावेळी आसोलीतील रिया धुरी, प्रिया नाईक, हनुमंत धुरी, वसंत धुरी, मिलींद नाईक, लक्ष्मी मेस्त्री, नारायण मेस्त्री, उमेश धुरी, सिताराम सडेकर, रवी धूरी, हर्षदा धुरी, महादेव धुरी, महानंदा नाईक, सेजल नाईक, विलास मेस्त्री, रमेश भानजी, संजय भानजी, नंदकुमार भानजी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. यादरम्यान सावंतवाडी माजी सभापती जगन्नाथ डेगवेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब, ओबिसी अध्यक्ष सचिन पेडणेकर, आसोली विभाग प्रमुख बंटी कांबळी, तुळस विभाग प्रमुख अवधूत मराठे, उमेश कुंभार, प्रशांत नाईक, सुरभा धुरी, मोहन जाधव, नारायण करेलकर, उदय कांबळी, देवेंद्र देऊलकर यासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा