You are currently viewing डिसेंबर नंतर ‘उखडे ऊखडे’ गॅंग सत्तेत नसणार…

डिसेंबर नंतर ‘उखडे ऊखडे’ गॅंग सत्तेत नसणार…

माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्वीकारले

सावंतवाडी

गेली वर्षभर राजकारणापासून अलिप्त असून देखील काल उद्घाटनासाठी आलेल्या माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्यावर नाहक टिका केली आहे. गेल्या वर्षभरात सावंतवाडी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरू आहे. आपणच इथले मालक असल्यासारखे सत्ताधारी वागत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यावेळी केला आहे. वर्षभर शहरात पोरखेळ सुरू असल्याचे ही ते यावेळी म्हणाले आहेत. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहरात जाऊन कानोसा घेतला असता तर सत्य परिस्थिती समोर आली असती असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे. तसेच यावेळी सभागृहाचा अपमान करणाऱ्या राजन तेली यांनी सभागृहाची माफी मागावी. असे देखील ते म्हणाले आहेत. तांत्रिक मंजुरी न आणता टेंडर काढले असून, नियमबाह्य ठराव घेण्यात आले असल्याचे ही ते म्हणाले. शहरात काल करण्यात आलेली उद्घाटन ही माझ्या काळातील असून ही उद्घाटन रखडून ठेवण्यात आली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. नगराध्यक्षांनी खुर्चीवर बसल्यानंतर शहरात केलेले एक तरी काम दाखवाव असे आवाहन देखील त्यांनी यावेळी दिले आहे. ही भाजपची टीम नसून भाजपात विचारवंत लोक असतात असे देखील ते म्हणाले. डिसेंबरमध्ये ही ‘उखडे उखडे’ गॅंग सत्तेत दिसणार नाही असा इशारा देत यांना घरी बसवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास देखील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे. ज्यावेळी लोकांना वाटत बबन साळगावकर संपला तेव्हा मी पुन्हा उभा राहतो हा इतिहास आहे. अशा शब्दात त्यांनी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेले आवाहन स्वीकारले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − one =