You are currently viewing पिवळे, केसरी, अंतोदय, अन्नपूर्णा रेशन कार्डधारकांच्या कुटुंबीयांना पदवी शिक्षणापर्यंत तसे शासकीय नोकरीत सवलत मिळावी – राजू मसुरकर

पिवळे, केसरी, अंतोदय, अन्नपूर्णा रेशन कार्डधारकांच्या कुटुंबीयांना पदवी शिक्षणापर्यंत तसे शासकीय नोकरीत सवलत मिळावी – राजू मसुरकर

पिवळे, केसरी, अंतोदय, अन्नपूर्णा रेशन कार्डधारकांच्या कुटुंबीयांना पदवी शिक्षणापर्यंत तसे शासकीय नोकरीत सवलत मिळावी – राजू मसुरकर

सावंतवाडी

पिवळे केसरी अंतोदय अन्नपूर्णा रेशन कार्डधारकांच्या कुटुंबीयांना शालेय शिक्षण कॉलेज व पदवीधर शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये सवलत शासनाकडून मिळाली पाहिजे

*सर्व समाजातील जातीतील व्यक्ती यामध्ये तेढ निर्माण न होण्यासाठी शासन निर्णय घेण्यात यावा असे मत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे*

*महाराष्ट्र शासनाने आता नव्याने शासन निर्णय करून पिवळे केसरी अंतोदय व अन्नपूर्णा ज्या महाराष्ट्रातील व्यक्तींकडे रेशन कार्ड वर नाव नमूद असेल त्या व्यक्तींना शालेय शिक्षण कॉलेज अशा प्रकारच्या विविध शिक्षणामध्ये तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती करण्यासाठी खास सवलत देऊन सध्या जो महाराष्ट्रामध्ये जातीयवाद व धर्मवाद चालू आहे त्याला एक प्रकारची खिळी बसू शकते असे मत सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुका जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे*

*ज्या व्यक्ती व कुटुंबाकडे सफेद रेशन कार्ड असेल त्या कुटुंबीयांतील व्यक्तींना या शासनाच्या सवलती मध्ये कुठलाही प्रकारची नोकरी व शालेय शिक्षणामध्ये सूट देऊ नये असे राजू मसूरकर यांनी म्हटले आहे*

*राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना ही ज्या कुटुंबातील व्यक्तींकडे व कुटुंबांकडे रेशन कार्ड असेल अशा व्यक्तींना ही मोफत आरोग्य योजना महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०११ सालापासून ही योजना राजीव गांधी जीवनदायी जन आरोग्य योजना या नावाने मोफत सुरू केली त्यावेळी कुठल्याही जातीचा व धर्माच्या व्यक्तींना मोफत त्या काळापासूनच ही योजना लाभली आहे*

*ही जन आरोग्य योजना करताना कुठलाही धर्माचा व जातीच्या व्यक्तींना आरक्षण न ठेवता वेगवेगळ्या समाजामध्ये जातीय तेड होऊ नये म्हणून सर्व राज्यातील व्यक्तींना व कुटुंबांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आली होती तशाच प्रकारे शालेय शिक्षण कॉलेज शिक्षण व पदवीधर शिक्षण व तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये अशा प्रकारचे शासन निर्णय घेतल्यास हा जातीयवाद निर्माण होणार नाही व सर्व समाजातील व्यक्ती व कुटुंबांना न्याय मिळू शकतो तसे प्रत्येक समाजातील जातीमध्ये गोरगरीब व्यक्ती आहेत त्यांच्या दृष्टीने शासन निर्णय घेण्यात यावा*

*अनेकदा ओबीसी जातीच्या व्यक्ती व कुटुंबीयांना शासनाच्या जटिल अटीमुळे ओबीसी दाखला मिळताना अडचणी निर्माण झाल्या असून त्यामध्ये वैश्य वाणी म्हणून आपल्या वडिलोपार्जित व्यक्तींची नोंद नसल्यास अशा कुटुंबीयांच्या व्यक्तींना ओबीसी दाखला मिळू शकत नाही वडिलोपाजित वैश्य अशी नोंद असल्यास देखील ओबीसी दाखला मिळत नाही*

*त्याप्रमाणे दैवज्ञ ब्राह्मण सुवर्णकार समाजामध्ये दैवज्ञ ब्राह्मण अशी नोंद असल्यास अशा कुटुंबातील व्यक्तींना ओबीसी दाखला मिळत नाही त्यामध्ये सोनार ही जात असल्यास ओबीसी दाखला मिळतो अशा प्रकारे विविध जातीमध्ये दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत त्याप्रमाणे ब्राह्मण व सारस्वत ब्राह्मण अशा विविध जातीच्या व्यक्ती व कुटुंबीयांना हे शासकीय सवलती शालेय शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणा अभावी न मिळाल्यामुळे जातीय तेड व द्वेष निर्माण झाले आहे*

*त्याप्रमाणे मराठा समाजाच्या कुणबी या जातींना नव्याने शासन निर्णय करून असे वादविवाद समाजामध्ये दिसत आहेत त्याला एक पर्याय शासनाने केसरी पिवळे अंतोदय व अन्नपूर्णा रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींना अशा सवलती दिल्यास हा वाद मिटू शकतो*

*त्याचप्रमाणे कुठल्याही न्याय प्रक्रियेवरती कुठलाही समाजाचा व्यक्ती घेल्यास त्यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारच्या शासन निर्णयाला स्थगिती न्यायालयाकडून मिळू शकत नाही व तो शासन निर्णय रद्द होणार नाही त्यामुळे सर्व समाज एकत्र आनंदाने नांदू शकतात ज्या व्यक्तींना आरक्षण पाहिजे असल्यास ते निवडणुकी पुरते मर्यादित राहू शकते त्याना आरक्षण पाहिजे असल्यास ते निवडणुकी पुरते संभाव्य उमेदवार न्यायालयात जाऊ शकतात*

*माझे आदर्श स्थान कै. शिवराम राजे भोसले यांनी माझ्याशी संवाद साधत असताना त्या काळामध्ये वेगवेगळ्या जाती कशा निर्माण झाल्या तरी सर्व जातीमधील व्यक्ती मूळ शेतकरी असून काही शेतकरी शेती पिकवल्यानंतर या गावातून दुसऱ्या गावांमध्ये धान्य विकण्यासाठी जात होते त्यांची जात ही वैश्य समाज म्हणून संबोधले गेले*

*काही शेतकरी युद्धावरती युद्ध खेळण्यासाठी गेले त्यांची जात क्षत्रिय मराठा म्हणून संबोधण्यात आली काही शेतकरी मच्छीमार करायला गेले त्यांची जात गाभिब म्हणून संबोधण्यात आली काही शेतकऱ्यांनी सुवर्ण व्यवसाय केला त्यांची जात दैवेद्य ब्राह्मण असे संबोधण्यात आली*

*वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जाती वेगवेगळ्या व्यवसायातून संबोधण्यात आल्यात यामुळे वेगवेगळ्या जातीतील आडनावे यामध्ये साम्य असते अशा प्रकारे सगळी माहिती सावंतवाडी संस्थांचे श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी मसूरकर यांना जाती कशाप्रकारे निर्माण झाल्या 1992 साली राजवाड्यामध्ये राजेसाहेब व मसूरकर यांच्या चर्चेवेळी सांगण्यात आले*

*देशाच्या हितासाठी तसेच देशाच्या सीमेवरती भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून या भारतभूमीचे सैनिक रक्षण करत आहेत त्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या समाजामध्ये द्वेषाची भावना होऊ नये म्हणून सर्व समाजाला एकत्र आणणे हे शासनाचे धोरण राबवले पाहिजे*

*त्यासाठी शासनाचे शासकीय नोकऱ्यांमध्ये तसेच शालेय शिक्षण, कॉलेज व पदवीधर शिक्षणामध्ये सवलती देऊन हा जातीयवाद नष्ट करून सर्व समाजाला एकत्र आणून सर्व समाजाच्या गोरगरीब व्यक्तींच्या दृष्टीने शासन निर्णय घेतल्यास त्याचा फायदा देशाची आबादी टिकण्यासाठी होईल असे मत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर दिली आहे*

⭕➖➖➖➖➖➖➖➖➖⭕

*आपला विश्वासू*
*श्री. राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*सोन्या- चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*तालुका. सावंतवाडी*
*जिल्हा. सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र. 9422435760*

🚩☸️✴️❇️☸️✴️❇️☸️✴️❇️🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा