You are currently viewing महामार्ग चौपदरीकरणाचे काम रामभरोसे….

महामार्ग चौपदरीकरणाचे काम रामभरोसे….

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची खासदार, पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका

कणकवली
महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही विभागात उपअभियंताच नसल्याचे दिसून येत आहे. खारेपाटण विभागातील उपअभियंताची कोल्हापूर येथे बदली झाल्यानंतर ते ईथे फिरत नाही आहेत. तर सावंतवाडी विभागाच्या उपअभियंताच्या जागी नविन अधिकाऱ्यांची नेमणुकच झाली नाही आहे. त्यामुळे ठेकेदारकडून ज्युनियर इंजिनिअर्सच्या देखरेखीखाली महामार्गाचे काम रामभरोसे सुरू आहे. खासदार, पालकमंत्री यांनी जनतेशी चालविलेला हा खेळ असून या साऱ्याकडे दुर्लक्ष करत केवळ काम पुर्ण करून ते हस्तांतरण करण्यातच स्वारस्य असण्यामागे नेमके गौडबंगाल काय? असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. महमार्ग चौपदरीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने, निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत मनसेने न्यायालयात याचीका दाखल केली आहे. त्यानंतर हे काम लवकरात लवकर पुर्ण करून ते हस्तांतरण करण्यावर खासदार, पालकमंत्री यांचा भर असल्याचे दिसत आहे. मुळात दोन महिन्यापूर्वी खारेपाटण विभागाचे उपअभियंता ओटवणेकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यांच्याकडे सांगली, सातारा विभाग आहे. तसेच खारेपाटण ते जानवलीपर्यंतच्या भागाचा अतिरीक्त पदभार त्यांच्याकडेच आहे. मात्र, बदलीनंतर ते फिरकलेलेच नाहित. तर सावंतवावाडी विभागाचे उपअभियंता पाटील यांच्यानंतर येथे अधिकृत उपअभियंता देण्यात आलेलेच नाहित. दोन्ही ठिकाणी केवळ ज्युनियर इंजिनिअर्सच काम पाहत आहेत. ठेकेदारची मंडळी त्यांना कोणत्याही प्रकारची दाद देत नाहित. अशी दयनीयस्थिती असताना अधिकारी न देता काम पुर्ण करून ते हस्तांतरण करण्यासाठी घाई का? असा सवाल उपरकर यांनी केला आहे. पालकंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीवेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी कार्यालयात आठवड्यात दोन दिवस त्यांचे अधिकारी थांबतील असे सांगितले होते. मात्र, असे अधिकारी थांबल्याचे एकदाहि दिसून आलेले नाहि. मात्र, त्याबाबत सत्ताधाऱ्यांना सोयर सुतक नाही. लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रह धरत सागरी जलमार्गासाठी परवानगी मिळवत ते सुरू केले. मात्र, शासनाने आता त्याला बंदी आणली. सत्ताधारीमंडळी लोकांच्या व्यवसायाशी खेळत आहेत. मात्र, जनतेच्या प्रश्नांनाबाबत या मंडळींना काहिच वाटत नाहि. जिल्हा शल्यचिकीत्सकांची बदली करतानाहि जनतेच्या सोयीसाठी पर्यायी डॉक्टरहि उपलब्ध केला नाहि. असलेल्या डॉक्टरांची बदली करताना दुसरे डॉक्टर नसतील तर लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळणार? मात्र, जनतेच्या समस्यांकडे सत्ताधारी खासदार, पालकमंत्री सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =