You are currently viewing भारताने डकवर्थ लुईस नियमाने पहिला टी२० सामना जिंकला

भारताने डकवर्थ लुईस नियमाने पहिला टी२० सामना जिंकला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने दोन धावांनी जिंकला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १३९/७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडियाने ६.५ षटकांत ४७/२ धावा केल्या. यानंतर पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. पंचांनी डकवर्थ लुईस पद्धतीनुसार भारतीय संघाला विजेता घोषित केले.

या सामन्यात भारतासाठी दोन वेगवान गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. जसप्रीत बुमराहने ११ महिन्यांनंतर भारताकडून सामना खेळला आणि पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. त्याचवेळी, प्रसिद्ध कृष्णा भलेही त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळत असेल, पण एकदिवसीय सामन्यातील त्याच्या शानदार कामगिरीनंतर सर्वांच्या नजरा त्याच्या पुनरागमनाकडे लागल्या होत्या आणि त्याने दोन विकेट घेत शानदार कामगिरीही केली. दोन्ही वेगवान गोलंदाज शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतत होते आणि दोघांनीही चमकदार कामगिरी केली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने ३२७ दिवसांनंतर पुनरागमन करत पहिल्याच षटकात अँड्र्यू बालबर्नी आणि लॉरन टकर यांना बाद करून आयर्लंडला बॅकफूटवर आणले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने हॅरी टेक्टर आणि जॉर्ज डॉकरेल यांना तंबूमध्ये परत पाठवले. पॉवरप्लेमध्ये चार गडी गमावून आयर्लंडच्या संघाला केवळ ३० धावा करता आल्या. भारतासाठी पुनरागमन करणाऱ्या बुमराह आणि कृष्णाने आयर्लंडला बॅकफूटवर आणले. मधल्या षटकांमध्ये रवी बिश्नोईने कर्णधार पॉल स्टॉलिंग आणि मार्क एडेअरला बाद केले. ३१ धावांत पाच विकेट्स गमावल्यानंतर आयर्लंडची अवस्था बिकट दिसत होती, परंतु मार्क एडेअर आणि कर्टिस कॅम्फर यांनी २८ धावा जोडून संघाला किंचित चांगल्या स्थितीत आणले. एडेअर १६ धावा करून बिश्नोईचा बळी ठरला.

आयर्लंडने ५९ धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅककार्थीने कॅम्फरसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. दोघांनीही वेगाने धावा केल्या. अखेरीस अर्शदीपने कॅम्फरला ३९ धावांवर त्रिफळाचीत केले. मात्र, मॅकार्थीने दुसऱ्या टोकाला फलंदाजी सुरू ठेवली आणि आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या आणि संघाची धावसंख्या १३९/७ पर्यंत नेली.

या सामन्यात अर्शदीप सिंगने शेवटचे षटक टाकले आणि २२ धावा दिल्या. मॅकार्थीने त्याच्याविरुद्ध दोन षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात अर्शदीपने नो बॉल आणि वाईड बॉलही टाकला, ज्यामुळे आयर्लंडचा संघ १३९ धावांपर्यंत पोहोचू शकला, तर १७व्या षटकातच आयर्लंडने १०० धावांचा टप्पा ओलांडला. १९व्या षटकानंतर आयर्लंडची धावसंख्या ११७/७ होती. या सामन्यात भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अर्शदीप सिंगला एक विकेट मिळाली. बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेत आयर्लंडची सुरुवात खराब केली. केवळ बुमराहच नाही तर दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या आणि पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णानेही दमदार कामगिरी करत दोन बळी घेतले. कृष्णानेही पहिल्याच षटकात एक विकेट घेतली. असे असूनही, बॅरी मॅकार्थीने नाबाद ५१ धावा केल्याने आयर्लंडने २० षटकांत ७ बाद १३९ धावा केल्या. बुमराहने २४ धावांत दोन बळी घेतले. डावाच्या १९व्या षटकात त्याने फक्त १ धाव दिली. अलिगढच्या रिंकू सिंगनेही टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

आयर्लंडच्या अडचणी तिथेच संपल्या नाहीत. डॉकरेल (१) आणि मार्क एडेअर (१६) बाद झाल्याने आयर्लंडची सहा बाद ५९ अशी अवस्था झाली. येथून कर्टिस कॅम्फर आणि बॅरी मॅककार्थी यांनी ४४ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करून आयर्लंडला १०० च्या पुढे नेले. अर्शदीपने ३३ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा करणाऱ्या कॅम्फरला बॉलिंग देत ही भागीदारी मोडली. मॅकार्थीने ३३ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या.

१४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी ३८ चेंडूत ४६ धावांची भागीदारी केली, परंतु क्रेग यंगने पहिल्या २३ चेंडूत २४ धावा करणाऱ्या यशस्वीला आणि पहिल्याच षटकात तिलक वर्माला (०) बाद केले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा गायकवाड १६ चेंडूत १० आणि संजू सॅमसन १ धावांवर नाबाद होते. पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही आणि भारत २ धावांनी सामना जिंकला.

प्रतिक्रिया व्यक्त करा