You are currently viewing खरा सूत्रधार कळाला….

खरा सूत्रधार कळाला….

जम्मू काश्मीर नागरोटामधील चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केलेल्या चार दहशतवाद्यांचा सूत्रधार हा दहशतवादी अब्दुल रऊफ असगर असल्याचे समोर आले आहे. असगर हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा जैश-ए-मोहम्मदचा सूत्रधार मसूद अजहर याचा तो भाऊ आहे.

तसेच चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी बनावटीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात वायरलेस सेट, क्यू-मोबाइल सेट्स, डिजिटल मोबाइल रेडिओ आणि पाकिस्तानात उत्पादित असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तसेच हे दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने घुसलेले असताना सतत पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या सूत्रधाराच्या संपर्कात होते. त्यामुळे आता या घटनेनंतर पाकिस्तानचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.

कलम ३७० च्या रद्द केल्यानंतर  काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी पुलवामा पेक्षाही मोठा हल्ला करण्याची जबाबदारी  पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने ( ISI) जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ अब्दुल रऊफ याच्यावर सोपवली आहे. याशिवाय आयएसआय, अब्दुल रऊफ असगर आणि काझी तारार या हल्ल्याच्या कटात सामील आहेत अशी माहिती ही समोर आली आहे.

इतकचं नाहीतर, जैशच्या दहशतवादी नेटवर्कचे मौलाना अबू जुंदाल आणि मुफ्ती तौसीफही यासंदर्भात झालेल्या बैठकीत सामील होते. ते कट रचल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या शकरगढ येथील शाखेला दहशतवाद्यांची निवड आणि प्रशिक्षण यासह अंतिम तयारी पूर्ण करण्याचं काम देण्यात आलं. त्यातील चार दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण घेतलं आणि काश्मीर खोऱ्यात भारतीय चौक्यांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी गोळीबाराचा सराव केला, असं सूत्रांन कडून सांगितलं जातं आहे.

भारतीय सीमेत घुसखोरी करण्यासाठी जैशच्या दहशतवाद्यांनी सांबा सेक्टरमध्ये सीमेपलिकडील नाल्यांचा वापर करून जम्मूतील कठुआ बाजूने सांबापासून ६ किलोमीटर अंतरावर जाटवालजवळ ट्रकमध्ये ते चढले. जैशने त्याच रात्री या भागात घुसखोरीही केली होती, असंही सूत्रांन कडून कळले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या हेतूने भारतात आत्मघातकी दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. परंतु भारतीय सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे या हल्लेखोरांना ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + seventeen =